महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने एक चेहरा पडद्यामागून काम करतो. आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis). अमृता फडणवीस या नेहमी चर्चेत राहणाऱ्या महिला आहेत. त्या नेहमी असे आहे नवीन करतात. की त्याची चर्चा होते. सोशल मीडियावर तर त्यांचे असंख्य चाहते आहेत. अमृता फडणवीस यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. सद्या मुंबईमध्ये स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. अमृता फडणवीस यांनी हातात ब्रश घेऊन पुतळयावर बसलेली धुळ काढली. बाजुने पाणी देखील सोडले. गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.
यावेळी अमृता फडणवीस यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. त्या म्हणाल्या की, नवरात्रोत्त्सवाला सुरूवात झाली आहे. या दिवशी स्वच्छतेला महत्त्व दिले जाते. या दिवशी गेटवे ऑफ इंडिया येथे स्वच्छतेसाठी आल्याचा आनंद होत आहे. आपल्या घराप्रमाणेच आजूबाजूच्या परिसरात देखील स्वच्छता केली पाहिजे. स्वच्छतेमध्ये लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास असतो. एक विनंती करते सर्वांना, महाराष्ट्राला स्वच्छ राज्या आणि मुंबईला सर्वात स्वच्छ शहर म्हणून पारितोषिक मिळायला हवे. त्यासाठी प्रयत्न करायला हवे.
हे सुद्धा वाचा
PM : पाकिस्तानात जन्मलेले भारताचे पंतप्रधान
Sonia Gandhi : सोनिया गांधींची डोकेदुखी वाढली
Shinde government : शिंदे सरकारने काढला गरीबांच्या तोंडातला घास
तसेच सुरक्षीत माता अभियानावर देखील त्या बोलल्या, प्रत्येक घरातील माता सुरक्षीत आणि शिक्षीत असायला पाहिजे. तसेच प्रत्येक मातेची प्रकृती उत्तम असायला हवी. तसेच गरब्याला बारा वाजेपर्यंत परवानगी दिली तर माला आवडेल असेही त्या म्हणाल्या. मी स्वत: दांडिया खेळायला जाते. सरकारने कायदा सुव्यवस्था पाहून गरब्याला परवानगी दिली पाहिजे असेही त्या यावेळी म्हणाल्या. स्वच्छता मोहिमेची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…