टीम लय भारी
मुंबई : जगभरात ‘कोरोना’च्या विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही हा विषाणू हातपाय पसरू लागला आहे. ‘कोरोना’च्या या परिणामामुळे ( Corona effect ) ‘भारतीय रिझर्व्ह बँके’ने ( RBI ) महत्वाचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्षाचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.
आरबीआयच्या या निर्णयामुळे ३१ मार्च अखेर कराव्या लागणाऱ्या आर्थिक व्यवहारांना आता तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. आरबीआयच्या केंद्रीय मंडळाची नुकतीच नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीत चालू आर्थिक वर्ष ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला पुढील आर्थिक वर्षाचा कालावधी हा १ जुलै २०२० ते ३१ मार्च २०२१ असा करण्यात आला आहे. ‘कोरोना’च्या संकटामुळे या दोन्ही आर्थिक वर्षांपुरताच हा बदल केला आहे.
कर्ज हप्ते फेडण्यासाठी मुदतवाढ द्या : अशोक चव्हाण
‘कोरोना’मुळे ( Corona Effect ) सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांना कामावर जाता येत नाही. अशा परिस्थितीत लोकांकडून विविध कर्जाचे हप्ते वसूल करणे योग्य होणार नाही. त्यासाठी कर्ज फेडण्यासाठीच्या हप्त्यांना मुदतवाढ देण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी केली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळविण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा
हे सुद्धा वाचा
Corona पसरविणाऱ्या वटवाघळाला समजून घ्या ( डॉ. महेश गायकवाड )
Coronavirus Update : साताऱ्यात 2 रूग्ण आढळले
WarAgainstVirus : शरद पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेही उत्कृष्ट काम करीत आहेत : जितेंद्र आव्हाड
नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…
गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना माेक्का (MCOCA) लावण्यात आला…
भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…
याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…
पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…