मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप

टीम लय भारी

मुंबई : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यावरून भाजप-शिंदे सरकारकडून शुक्रवारी या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. परंतु याबाबतचा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या निर्णयाला अखेर भाजप-शिंदे सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा दि. बा. पाटील यांचे आंव देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली.

या पत्रकार परिषदेच्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष थेट निवड करण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप केला आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड जनतेने केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पैशांची खेळी करता येणार नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड थेट जनतेने करावी असा निर्णय भाजाप-सेनेचे सरकार असताना घेण्यात आला होता. पण हा निर्णय महाविकास आघडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर काढून टाकण्यात आला. परंतु आता भाजपने शिंदे गटासोबत सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे. या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे.

सदर निर्णय हा गुरुवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आला. म्हणून या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस पक्षाला पैशांची खेळी करता येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, या निर्णयामुळे पात्र तसेच जनतेचा आवडता व्यक्ती या पदावर बसेल म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या निर्णयामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पैशांची खेळी करता येणार नाही. जवळपास सर्वच राज्यात सरपंच आणि नगराध्यक्ष यांची जनतेकडून निवड करण्यात येते. फक्त अजूनही महाराष्ट्र्रात असे होत नाही. इतकेच नव्हे तर महापौर सुद्धा जनतेतूनच निवडण्यात येतो. पण आपल्याकडे तसे होणार नाही, असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :

पालघरमध्ये शिवसेनेला बसला मोठा धक्का

भाजप नेत्यानेच ‘मोदीभक्तां’ची केली चंपी

विरोधक मुद्यावरुन थेट गुद्यावर

पूनम खडताळे

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

6 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

6 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

7 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

7 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

7 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

17 hours ago