टीम लय भारी
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल (दि. २९ जुलै २०२२) अंधेरी येथील एका कर्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा हे सुद्धा उपस्थित होते. याचवेळी राज्यपाल कोश्यारी यांनी गुजराती आणि मारवाडी समाजामुळे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून ओळख मिळाली असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय पुढाऱ्यांसोबतच सामान्य नागरिकांनी सुद्धा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा निषेध करत खरपूस समाचार घेतला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याबाबत सर्वांनी नाराजी व्यक्त केली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. ट्विटरवरून जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. इतकेच नाही तर त्यांनी राज्यपालांना ज्या राज्याविषयी प्रेम आहे त्या राज्यात जाऊन राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. दिल्लीतील बॉसला खुश करण्यासाठी महामहिम पदावरील व्यक्ती काहीही बोलत असल्याचा टोला सुद्धा यावेळी जयंत पाटील यांनी लगावला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कायमच आपली बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद देखील झाले आहेत. पण या वक्तव्यामुळे समस्त मराठी जणांच्या भावना दुखावल्या आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे जयंत पाटील चांगलेच संतापले आहेत. भाजपला राज्यपालांचे हे वक्तव्य मान्य आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.
राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांसह शिंदे गटाने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. पण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मात्र राज्यपालांची पाठराखण केली आहे. राज्यपालांनी कोणाच्याही भावना दुखावला नसल्याचे मत नितेश राणेंनी व्यक्त केले आहे. यामुळे ट्विटरवर आणि सोशल मीडियावर चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.
हे सुद्धा वाचा :
विद्यमान संकटातूनच उद्धव ठाकरे शिवसेनेला मजबूत करतील
अख्खं गाव चार दिवस पाण्यात; अजित पवारांनी घरात जाऊन अश्रू पुसण्याचा केला प्रयत्न !
काय ते मुख्यमंत्री.. काय ते उपमुख्यमंत्री..सगळं ओक्के मध्ये नाहीये, आंबादास दानवेंचा हल्लाबोल
नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…
गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना माेक्का (MCOCA) लावण्यात आला…
भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…
याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…
पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…