देशामध्ये तसेच राज्यामध्ये सरकार अनेक कामं करणार असल्याचं केवळ आश्वासन देत आहे. मात्र प्रत्यक्षात कामाच्या बाबतीत बोंब पाहायला मिळत आहे. विक्रोळी शहरातील कन्नमवार भागात गेली अनेक वर्षांपासून महात्मा ज्योतिबा फुले रूग्णालयाच्या पुनर्विकासासाठी सरकार आश्वासन देत आहे. अनेक वर्षे सरत चालली असूनही सरकार कोणतंही ठोस पाऊल उचलत नसून केवळ आश्वासनाचा पाऊस पाडत आहे. मात्र या रूग्णालयाच्या पुनर्विकासाबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. तांत्रिक कारणामुळे जुलैमध्ये निविदा काढण्यात आली आहे. २०२३ चे अंतिम वर्ष आता संपल्यात जमा आहे. तरीही कोणतीही ठोस भूमिका सरकारने घेतली नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून रूग्णालयाचे काम जसेच्या तसेच राहिल्याने याचा त्रास आता रहिवाशांना सहन करावा लागत आहे. २०१८ मध्ये पालिकेने रूग्णालयाला धोकादायक ठरवले असून रूग्णालय बंद करण्यात आलं आहे. याच रूग्णालयामध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. घाटकोपर आणि कांजूरभागातील रूग्णांना या रूग्णालयाशिवाय इतर कोणतंही मोठं रूग्णालय नसल्यानं रहिवाशांना मोठ्या प्रमाणात समस्येचा सामना करावा लागत आहे. कुर्ला, शीव, घाटकोपर याभागातील रूग्णालयामध्ये विक्रोळीतील रूग्णांना जावं लागत आहे. यामुळे मोठी समस्या तयार होऊ लागली आहे.
हे ही वाचा
महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला
‘२०२३ मावळताना शिवसेनेचा सूर्य तेजानं दिसतोय’, मावळ मतदारसंघाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे
आयपीएल खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात, बलात्काराचा गंभीर आरोप
रूग्णालयाच्या पुनर्विकासासाठी एकनाथ शिंदेंना पत्र
या रूग्णालयाच्या रखडलेल्या कामांवरून अशोक खरात आणि मिलिंद परब यांनी आझाद मैदानावर उपोषणही केलं आहे. तसेच यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रूग्णालयाच्या पुनर्विकासाबाबत पत्रही लिहिलं आहे. महात्मा फुले रूग्णालयाचा पुनर्विकास करत असताना रूग्णालयाच्या आजूबाजूच्या भूखंडाचा समावेश देखील होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. ३२ हजार ८३५ चौरस मीटरचा भूखंड असणार आहे. हा भूखंड म्हाडाचा आहे. म्हाडाला पालिकेने १३ कोटी ५६ कोटी रूपये दिले आहेत.
काय होतं पत्रात?
अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या रूग्णालयाच्या कामामध्ये आता रहिवाशांनी आझाद मैदानावर उपोषण केलं आहे. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेंना पत्र देखील लिहिलं आहे. या पत्रामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेमध्ये रूग्णालयाच्या निविदेनाबाबत आश्वासन दिलं होतं. मात्र उदय सामंत यांनी शब्द पाळला नसल्याचं पत्रामध्ये रहिवाशी आणि उपोषणकर्ते मिलिंद परब यांनी लिहिलं असून आपली खंत व्यक्त केली आहे.
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…