टीम लय भारी
मुंबई: २०१४ पासून देशात मोदी सरकार सत्तेत आले. मात्र देशातील बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला येऊन महागाईने उच्चांक गाठला आहे. सध्या बेरोजगारीचा दर ७.८३ टक्क्यावर पोचला आहे. मात्र भोंग्यांसारख्या निरुपयोगी विषयांकडे जनतेचे लक्ष वेधून अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण प्रश्नातून केंद्रसरकारची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते महेश तपासे यांनी मोदी सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षातील कोरोनाचे संकट आणि दिवसेंदिवस देशातंर्गत वाढत असलेल्या महागाईमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास विलंब होत असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत असेही महेश तपासे म्हणाले.
अलीकडेच, देशाची अर्थव्यवस्था सावरायला १२ वर्षे लागतील अशी चिंता आरबीआयने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. त्यामुळे महेश तपासे यांनी नको ते विषय काढून महागाई व बेरोजगारीकडे दुर्लक्ष करणार्या केंद्रसरकावर टीका केली आहे.
हे सुद्धा वाचा:
देवेंद्र फडणवीस यांच्या तीन वर्षापूर्वीच्या तक्रारीचे काय? राष्ट्रवादी नेत्यांनी उभे केले नवे प्रश्न
On Jodhpur Violence, Rajasthan CM Gehlot Says BJP Targeting State
हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा ('400 par' slogans) देत…
जिल्ह्यातील लोकसभेच्या (Loksabha) दोन्ही जागांसाठी सोमवारी (दि. ६) माघारीची प्रक्रिया पार पडली. माघारीनंतर लगेचच उमेदवारांना…
अजित दादा, काय करून ठेवलंय तुम्ही हे. अहो, बारामतीचा अख्ख्या देशात नावलौकीक होता. विकास म्हणजे…