मुंबई

अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील उमेदवारांकरिता संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करा:छगन भुजबळ

अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी ‘बार्टी, महाज्योती, तार्ती, सारथी, अमृत’ या संस्थांच्या धर्तीवर संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करण्यात यावी. अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘बार्टी, महाज्योती, तार्ती, सारथी, अमृत’ या संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांकरिता विविध उपक्रम, कार्यक्रम इ. राबविण्यात येऊन विद्यार्थी युवक-युवती इत्यादींचा शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगिण विकास करण्यासाठी संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करण्याची आवश्यकता आहे.

तसेच राज्यातील सर्व घटकांतील नागरिकांच्या विकासाकरीता राज्य शासन प्रयत्नशील असल्याने अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार उद्योग-उद्योजकता याकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण व क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी ‘बार्टी, महाज्योती, तार्ती, सारथी, अमृत’ या संस्थांच्या धर्तीवर संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करणेबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

काँग्रेसच्या काळात आमच्याकडे खूप विकास झाला, नरेंद्र मोदींचा काळ अत्यंत वाईट

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता  होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

21 mins ago

दाभोलकर हत्ये प्रकरणी दोघांना जन्मठेप तर सबळ पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.(Narendra Dbholakar Murder case: Pune court…

56 mins ago

नगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा जोरात चालवतोय

लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना…

3 hours ago

BMC देणार मुंबईतील या  चौकाला ‘श्रीदेवी कपूर’ चं नाव

  बॉलीवूडची हवाहवाई गर्ल, अभिनेत्री श्रीदेवी जिने ८०-९० चं दशक गाजवलं, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.(BMC…

3 hours ago

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…

3 hours ago

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

21 hours ago