पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन उदारमतवादी पत्रकार आणि लेखक तारेक फतेह यांचे 24 एप्रिल रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तारिक फतेह यांची मुलगी नताशाने ट्विट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “पंजाबचा सिंह, भारताचा पुत्र, कॅनडाचा प्रेमी, सत्याचा वक्ता, न्यायासाठी लढणारा आवाज, दीन-दलित दुबळे अत्याचारित लोकांचा आवाज. त्यांची क्रांती त्यांना ओळखणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत कायम राहील, अशा आशयात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तारिक फतेह स्वत:ला भारतीय असल्याचे म्हणायचे. भारत पाकिस्तानच्या धार्मिक कट्टरतेचा ते विरोध करायचे. ते भारतीय संस्कृतीचं कौतुक करायचे. तसेच भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांना एकत्र जोडण्याचे विचार मांडायचे. फतेह यांना हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी आणि अरबी भाषेचं ज्ञान होतं. त्यांना त्या भाषा अवगत होत्या. तसेच त्यांना मानवी हक्कांचे कार्यकर्तेदेखील मानलं जायचं. ते अनेकदा भारतीय टीव्ही चॅनल्सच्या चर्चासत्रांमध्ये सहभागी होताना दिसायचे. तसेच ते पाकिस्तानातील बलुचिस्तानात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे समर्थन करायचे. तसेच ते पाकिस्तानात घडणाऱ्या अनेक घडामोडींवर रोखठोक मत मांडायचे.
तारिक फतेह यांचा जन्म 1949 साली पाकिस्तानमध्ये झाला आणि त्यानंतर 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी कॅनडाला प्रस्थान केले. कॅनेडियन-आधारित लेखक इस्लाम आणि दहशतवादावरील त्यांच्या स्पष्ट विधानांसाठी प्रसिद्ध होते. फतेह यांनी अनेक वेळा पाकिस्तानवर टीका करताना भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पाठिंबा दिला होता. त्यांनी कॅनडामध्ये राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि टेलिव्हिजन होस्ट म्हणून काम केले आहे आणि अनेक पुस्तके लिहिली आहेत. तसेच रेडिओवरही त्यांनी काम केलं असून त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
Tarek Fatah, son of Hindustan, Pakistani writer, Tarek Fatah passed away, Tarek Fatah : son of Hindustan, Pakistani writer Tarek Fatah passed away
मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…
जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…
दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…