राष्ट्रीय

दिल्लीत भाजपची 15 वर्षांची सत्ता कोसळली; आम आदमी पक्षाला मतदारांचा कौल

आज दिल्ली महापालिकांच्या निकालामध्ये भाजपची सफाई होऊन मतदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या झाडूला पसंती दिली आहे. दिल्लीतील 15 वर्षांची सत्ता अरविंद केजरीवाल यांनी आपल्याकडे खेचून आणली आहे. आम आदमी पक्षाने बहुमताचा 226 जागांचा आकडा पार करत जागांवर 135 जागा मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतीय जनता पक्ष 102 जागांवर पिछा़डीवर राहिला असून काँग्रेसचा मतांचा टक्का खुपच खाली घसरल्याचे दिसत आहे. काँग्रेसला अवघ्या 7 जागा मिळाल्याचे आतापर्यंत हाती आलेल्या निकालांवरुन दिसत आहे.

दिल्ली महापालिकांच्या निवडणूकांची मतगणना सुरू आहे. आम आदमी पक्ष आणि भाजप या दोन पक्षांमध्ये आटीतटीची लढाई मतमोजणी दरम्यान दिसून आली दिल्लीच्या 135 जागांवर विजय मिळवत आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या 15 वर्षांच्या सत्तेला आपल्याकडे खेचून आणले आहे. निकालाचे संपूर्ण आकडे जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा पार केल्याने मतदारांनी केजरीवाल यांना कौल दिल्याचे दिसत आहे.

मतदान मोजणी सुरू झाल्यापासूनच आम आदमी पक्ष भाजपच्या पुढे असल्याचे दिसून येत होते. सकाळी दहा वाजलेपासून भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये काँटे की टक्कर असे चित्र दिसून येत होते. दरम्यान 250 जागांचे मतमोजणीचे पहिले चित्र समोर आले त्यावेळी भारतीय जनता पक्षाला टक्कर देत आम आदमी पक्षाने भाजपची 15 वर्षांची सत्ता आपल्याकडे खेचून आणल्याचे दिसून आले. दरम्यान दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील जोरदार जल्लोष करायला सुरूवात केली आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत देखील वाढ झालेली दिसून आली.
हे सुद्धा वाचा
सीमा वादाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात नेत्यांमध्येच वाद पेटला
UPSC Mainsचा निकाल जाहिर, जाणून घ्या मुलाखतींबाबतची पूर्ण माहिती
बदली प्रमाणपत्राशिवायही शाळांमध्ये मिळणार प्रवेश; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी गेल्या निवडणुकांच्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढलेली आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या मतांची टक्केवारी 39 टक्के असल्याची दिसत असून काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीमध्ये आणखी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणूकीपेक्षा काँग्रेसची मतांची टक्केवारी ९ टक्क्यांनी घटली असून 12.5 टक्के मते या निवडणुकीत काँग्रेसला मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला 272 प्रभागांमध्ये 181 जागा आम आदमी पक्षाला 49 जागा आणि काँग्रसेला 31 जागावर विजय मिळाला होता.

प्रदीप माळी

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

6 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

6 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

7 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

7 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

8 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

9 hours ago