राष्ट्रीय

Morbi Bridge Collapse : ‘देवाची करणी’ ! मोरबे पूल प्रकरणात ओरवे कंपनीच्या व्यवस्थापकाचा अजब दावा

रविवारी (ता. 30 ऑक्टोबर) गुजरातमधील मोरबी येथील झुलता पूल कोसळल्याने (Morbi Bridge Collapse) अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलिसांकडून या पुलाची देखरेखीची जबाबदारी असलेल्या ओरेवा कंपनीवर तसेच नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांकडून एक महत्वपूर्ण माहिती कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे. या झुलत्या पुलाच्या तारांना गंज लागला होता, या तारांची दुरुस्ती करण्यात आली असती तर हा दुर्दैवी अपघात घडला नसता, अशी माहिती पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आली आहे. तर ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक दीपक पारेख यांनी ईश्वराची इच्छा असल्याने हा आपुला कोसळला असा अजब दावा केला आहे. या घटनेमध्ये 140 जणांनी आपला जीव गमावला आहे.

मोरबी पूल दुर्घटनेचे तपास अधिकारी जाला यांनी यांबाबतची माहिती कोर्टात देताना सांगितले की, हा पूल तारांच्या आधारे उभा होता. बऱ्याच महिन्यांपासून या पुलाच्या तारांना तेलपाणी म्हणजेच ऑइलिंग किंवा ग्रीसिंग करण्यात आले नव्हते. या पुलाच्या ज्या ठिकाणी तारा तुटल्या, त्यांना गंज लागण्यात आला होता. त्यामुळे या पुलाचे नेमके कोणते दुरुस्तीचे काम करण्यात आले होते ? ते कसे करण्यात आले होते ? याबाबतचे कोणतेच पुरावे अथवा कागदपत्र ठेवण्यात आलेले नाहीत. या पुलाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मग या पुलाच्या दुरुस्तीसाठी आणि देखभाल करण्यासाठी जे साहित्य खरेदी करण्यात आले होते त्याची तपासणी अद्यापही करण्यात आलेली नाही. तर या पुलाचे कंत्राट ज्या अभियंत्यांना देण्यात आले होते त्यांच्याकडून पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नव्हते, अशी माहिती सरकारी वकील एच. एस. पांचाळ यांच्याकडून देण्यात अली आहे.

हे सुद्धा वाचा

Gujarat Morbi Bridge Collapse : इंग्रजांनी बांधलेला 140 वर्ष जूना पूल भाजप सरकारने 5 दिवसांत पाण्यात घातला

Bachhu Kadu : ‘सत्ता गेली चुलीत, आम्हांला त्याची पर्वा नाही!’ बच्चू कडू आक्रमक

Nitin Raut : पोलिसांची दंडेली! माजी मंत्री नितीन राऊत यांना मोठी दुखापत

या अपघाताप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. या नऊ जणांमधील दीपक पारेख, दिनेशभाई महासुखराय दवे, कंत्राटदार प्रकाशभाई लालजीभाई परमार आणि देवांगभाई प्रकाशभाई परमार यांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे.

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून तातडीची मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा गुजरात सरकारने केली आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

40 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

1 hour ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

2 hours ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

18 hours ago