राष्ट्रीय

‘जागतिक दहशतवादी’ दाऊद इब्राहिम याच्यावर राष्ट्रीय अन्वेषण अभिकरणाने (NIA) २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले

राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण (NIA) ने ‘अंतरराष्ट्रीय दहशतवादी’ दाऊद इब्राहिम याच्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले. जेणेकरून त्याची अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना मदत मिळेल. (National Investigation Agency) ने दाऊद इब्राहिमचा नवीन फोटो सुद्धा जारी केले. राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण (NIA) ने दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकील, जावेद चिकना आणि टायगर मेनन यांच्यावर सुद्धा प्रत्येकी १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले. हे सर्व मुंबई १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचे आरोपी आहेत. राष्ट्रीय अन्वेषण अभिकरणाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले की, दाऊद इब्राहिम आणि त्याचे सहकारी यांचे दशहतवादी संघटना लष्कर-ए-तोयब्बा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्या दहशतवादी संघटनांच्या सहाय्याने तो भारतात समाज विघातक कारवाया करत आहे.

देशाच्या सर्वोच्‍च केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने हे सुद्धा स्पष्ट केले की, दाऊद इब्राहिम आणि त्याचे हस्तक भारतात बेकायदेशीर रित्या शस्त्रांची तस्करी करणे, मनी लाँड्रिंग, अंडर-वर्ल्डच्या गुन्हेगारी कारवाया, नकली नोटांचा व्यवसाय, स्वत:ची मालमत्ता वाढवण्याच्या हेतुने बेकायदेशीर पद्धतीने मालमत्तेचा ताबा यासारख्या प्रकरणांमध्ये सामिल आहेत.

हे सुद्धा वाचा

Digital Rape : देशात पहिल्यांदाच ‘डिजीटल रेप’ प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

Brahmastra : रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Nana Patole : हिंदुत्त्वाचा डंका मिरवणाऱ्या इव्हेंटबाज सरकारनेच हिंदू शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर- नाना पटोले

संयुक्त राष्ट्रसंघाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ठराव १२६७ अन्वये दाऊद इब्राहिमचा जागतिक दहशतवादयांच्या यादीत समावेश केला आहे. दाऊद इब्राहिमची अनीस इब्राहिम, छोटा शकील, जावेद चिकना आणि टायगर मेनन यांच्या मदतीने ‘डी’ कंपनीच्या नावाने भारतात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असल्यामुळे यूएपीए (Unlawful Activities Prevention Act) कायद्याच्या चौथ्या परिशिष्टात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

दाऊद इब्राहिम हा मुंबई १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेच्या मुख्य आरोपींपैकी एक आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार तो सध्या पाकिस्तानात वास्तव्यास आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी १९९३ साली मुंबईच्या महत्त्वाच्या बारा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या दुर्देवी घटनेमध्ये २५७ लोकांचा नाहक बळी गेला आणि ७०० जण गंभीर जखमी झाले होते. दाऊद इब्राहिमने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) च्या मदतीने या घटनेला प्रत्यक्षात आणले. तेव्हापासून दाऊद इब्राहिम आणि त्याचे सहकारी भारतातून पसार झाले आहेत. त्या घटनेच्या जवळपास २९ वर्षांनी सुद्धा भारतीय सुरक्षा यंत्रणांना त्यांना जेरबंद करण्यास यश आलेले नाही.

टीम लय भारी

Recent Posts

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

19 mins ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

35 mins ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

2 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

3 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago