IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम अजून देखील एक सुद्धा सामना जिंकू शकली नाही आहे. सोमवारी राजस्थान रॉयल्सनी (Rajasthan royals vs Mumbai Indians) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या सामन्यानंतर पासून हार्दिक पांड्याला घेऊन नवीन चर्चा सुरु झाली. काही लोकांचे म्हणणे आहे की, यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला अजून देखील एकही सामना जिंकण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या हातातून कर्णधारपदाची जबाबदारी जाऊ शकते. (Hardik Pandya be stripped of his captaincy before the mumbai indians next match)
मुंबई इंडियन्सनी हार्दिक पांड्याला आपल्या संघात सामील करून घेत त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली. यावेळी त्यांनी 5 वेळा IPL ची ट्रॉफी जिंकवणाऱ्या रोहित शर्माकडे दुर्लक्ष केला. या हंगामात रोहित शर्मा केवळ फलंदाज म्हणून खेळत आहे. चाहत्यांना ही गोष्ट सुरुवातीपासूनच आवडली नाही आणि मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यापासून हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोल केले जात आहे. घरच्या मैदानावर कोणत्याही संघाच्या कर्णधाराची अशी बोचरी खेळी याआधी पाहायला मिळाली नाही. (Hardik Pandya be stripped of his captaincy before the mumbai indians next match)
ऑरेंज कॅपच्या लिस्टमध्ये झाली या धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री, पहा कोण आहे हा खेळाडू
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर, मनोज तिवारी आणि वीरेंद्र सेहवाग यांनी क्रिकबझवर या सामन्याच्या निकालाची चर्चा केली. यावेळी मनोज तिवारी म्हणाले, ‘मी खूप मोठी गोष्ट सांगणार आहे. पुढील सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला सहा दिवसांचा ब्रेक मिळाला असून या सहा दिवसांत हार्दिक पांड्याला कर्णधारपद गमवावे लागण्याची शक्यता आहे. हार्दिककडून कर्णधारपदाच्या चुका झाल्या आहेत आणि त्या दिसून येत आहेत. मग ते गोलंदाजातील बदल असोत किंवा फलंदाजीतील चढ-उतार असोत. (Hardik Pandya be stripped of his captaincy before the mumbai indians next match)
चेन्नई विरुद्ध सामन्यात ऋषभ पंतने केली ही मोठी चूक, BCCI ने ठोठावला 12 लाखांचा दंड
मनोज तिवारी म्हणाला, ‘हार्दिकने घरच्या मैदानावर गोलंदाजी केली नाही, जिथे स्विंग उपलब्ध होती, यावरून तो दडपणाखाली असल्याचे दिसून येते. याशिवाय फलंदाजी क्रमवारीत काही निश्चित नाही, कधी टिळक वर्मा वर येतात, तर कधी डेवाल्ड ब्रेविस. मात्र, वीरेंद्र सेहवाग मनोज तिवारीशी सहमत होताना दिसत नाही. मुंबई इंडियन्सने पाच सामने गमावल्यानंतरही जेतेपद पटकावले आहे आणि हार्दिकला अजून काही सामने मिळायला हवेत, असे सेहवागने सांगितले. (Hardik Pandya be stripped of his captaincy before the mumbai indians next match)
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…