मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा कर्णधार बनवला आहे. तेव्हापासूनच हार्दिक पांड्या चर्चेत आहे. एकीकडे गुजरात टायटन्सचे चाहते हार्दिकवर संघ सोडल्याबाबत नाराज आहे. तर दुसरीकडे हार्दिककडून रोहित शर्मासोबत केलेली वागणूक पाहून मुंबई इंडियन्सचे चाहते नवीन कर्णधारवर राग धरून बसले आहे. (Mumbai Indians Rohit Sharma sets field as hardik pandya runs to boundary) गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेल्या सामन्यात फील्ड प्लेसमेंटचा भाग म्हणून रोहितला हार्दिकने सीमारेषेवर जाण्याची सूचना केली होती. हा c सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पॉइंट टेबल बदलले, या 4 टीम आहे टॉप वर
मात्र, आता त्याच्यासोबत देखील असच काही झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माने आपली ताकद दाखवत हार्दिकला सीमारेषेवर धाव घेतली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहित त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसला आणि हार्दिकला बरंच काही समजावतानाही दिसला. मुंबई इंडियन्सकडून झालेल्या पराभवानंतरही रोहित टीम मालक आकाश अंबानी आणि कर्णधार हार्दिकसोबत बराच वेळ बोलत होता. (Mumbai Indians Rohit Sharma sets field as hardik pandya runs to boundary)
हार्दिक पांड्याने सांगितले मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण, जाणून घ्या काय म्हणाला MI चा कर्णधार
सनरायझर्स हैदराबादने बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध तीन गडी गमावून २७७ धावा केल्या, हा आयपीएलमधील एक नवा विक्रम आहे. सनरायझर्सच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रचंड धावा केल्या, ज्यामुळे त्यांचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 5 गडी गमावून 263 धावांचा विक्रम मागे टाकण्यात यशस्वी ठरला.
ट्रॅव्हिस हेडने 24 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या तर अभिषेक शर्माने 23 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांसह 63 धावा केल्या. हे दोघेही बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन (34 चेंडूत नाबाद 80, चार चौकार, सात षटकार) आणि एडन मार्करम (28 चेंडूत नाबाद 42, दोन चौकार, एक षटकार) यांनी 55 चेंडूत 116 धावांची अखंड भागीदारी केली. (Mumbai Indians Rohit Sharma sets field as hardik pandya runs to boundary)
मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…