क्रीडा

NZ vs IND : कर्णधार हार्दीकचा दबदबा कायम! न्यूझीलंडला धूळ चारत जिंकला टी-20 सामना

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. सूर्यकुमार यादवच्या शानदार शतकी खेळीनंतर युझवेंद्र चहलच्या चतुरस्त्र खेळीने यजमानांना खिंडार पाडले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 बाद 191 धावा केल्या. सूर्यकुमारने टी-20 मध्ये दुसऱ्यांदा शतक झळकावले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 18.5 षटकांत केवळ 126 धावाच करू शकला. भारताने 65 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

तत्पूर्वी, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाची सुरुवात करताना ऋषभ पंतने (06 धावा) पुन्हा एकदा निराशा केली, पण त्यानंतर इशान किशन आणि सूर्य कुमार यादव यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. इशान किशनने 31 चेंडूत 36 धावांची खेळी केली. याशिवाय सूर्य कुमार यादव वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मधल्या फळीत मोठी खेळी करता आली नाही. सूर्य कुमार यादवने एकट्याने आघाडी घेतली आणि तुफानी फलंदाजी करताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे शतक झळकावले. सूर्य कुमार यादवने 51 चेंडूत 111 धावांची खेळी केली. सूर्य कुमार यादवने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 7 षटकार मारले. 20व्या षटकात न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने सलग तीन चेंडूंवर हार्दिक पांड्या, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाद करून टी-20 मधील दुसरी हॅट्ट्रिक साधली. भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 191 धावा केल्या.

हे सुद्धा वाचा

Chhatrapati Shivaji Maharaj : ‘महाराजांनी औरंगजेबाला माफीसाठी 5 पत्रे लिहिली होती’, भाजप प्रवक्त्याची जीभ घसरली

Ganesh Katkar : भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी गणेश काटकर यांची नियुक्ती

Shraddha Walker murder : श्रद्धाने आफताबविरोधात 2020साली केली होती पोलिस तक्रार!

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने पहिल्याच षटकात फिन ऍलनची (00 धावा) विकेट गमावली. याशिवाय डेव्हन कॉनवे आणि केन विल्यमसन यांनी 56 धावांची भागीदारी केली. कॉनवे (25 धावा) बाद झाल्यानंतर दुसऱ्या टोकाकडून ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. ग्लेन फिलिप्स (12 धावा), डॅरेल मिशेल (10 धावा), जिमी नीशम (00 धावा), मिचेल सँटनर (02 धावा) फ्लॉप ठरले. केन विल्यमसनने अर्धशतक झळकावले आणि 52 चेंडूत 61 धावांची खेळी करून बाद झाला.

टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे आहे, तर या टीममध्ये शुभमन गिल, उमरान मलिक सारखे युवा खेळाडू आहेत. टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

प्रणव ढमाले

Recent Posts

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

8 mins ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

16 mins ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

30 mins ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

44 mins ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

4 hours ago

नाशिक: पाणीगळती रोखण्यासाठी स्काडामीटर बसवण्याचा प्रस्ताव

नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे…

5 hours ago