राजकीय

काश्मीर प्रश्नाला उशीर का झाला? अमित शहांचा कॉंग्रेसला सवाल

जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा निर्णय दिला. काही दिवस सुनावणी सुरू असताना ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत निर्णय रोखून ठेवला. लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करून जम्मू आणि काश्मीरमध्ये३० स्पटेंबर २०२४ पर्यंत निवडणूक घ्याव्यात. दरम्यान भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पंडित नेहरू आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानविरोधात युद्धजन्य परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर त्यावेळी पाकिस्तानविरोधात युद्धविराम झाला नसता तर पिओकेची घटना घडली नसल्याची माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले अमित शहा?

अमित शहांनी ३७० कलम हटवण्याबाबत बोलत असताना काँग्रेस आणि नेहरूंवर निशाणा साधला आहे. शहा म्हणाले की, काश्मीर पेक्षा मोठी समस्या हैद्राबाद येथे होती. नेहरू त्या ठिकाणी गेले नाहीत. लक्षद्वीप, जुनागड, जोधपूर येथे नेहरू गेले नाहीत, असे अमित शहा म्हणाले आहेत. नेहरूंनी काश्मीरचे काम पाहिले आणि तेही अर्धवट सोडले. काश्मीर प्रश्नाला उशीर का झाला? असा प्रश्न उपस्थित करत शहांनी १००० वर्षाखाली गाडलेला इतिहासाचे सत्य बाहेर येतेच म्हणत अमित शहांनी टीका केली आहे.

हे ही वाचा

‘भाजपा वाजपेयींची राहिली नाही’

देशात डेंग्यूचं सावट; राज्य तिसऱ्या क्रमांकावर

वूमन्स आयपीएलमध्ये काशवी गौतमवर सर्वाधिक बोली ‘या’ संघाने मोजले कोट्यवधी

कलम ३७० का हटवण्यात आलं नाही

विलिनीकरणासाठी शेख अब्दुल्ला यांच्यामुळे विलंब झाला. राज्याचे जरी विलीनीकरण झालं असलं तरी कलम ३७० का हटवण्यात आलं नाही. यासाठी कोणी मान्यता दिली आणि अट कोणी घातली याची उत्तर जनतेला द्यावी लागतील, असे अमित शहा म्हणाले आहेत.

१९४७ सालात जम्मू आणि काश्मीरमध्ये नेहरूंनी सैन्य पाठवण्यासाठी विलंब केला होता. सरदार वल्लभभाई पटेलांच्या सांगण्यावरून नेहरूंनी सैन्य पाठवले. हे मी म्हणत नाही तर नेहरू मेमोरिअल पुस्तकात नेहरूंनी स्वतः मान्य केलं आहे. चुकीच्या कलमामागे ते संयुक्त राष्ट्रासोबत गेले. काश्मीरमधील ठराविक कुटुंब सरकार चालवत असल्याचा खळबळजनक दावा अमित शहा यांनी केला आहे.

कलम ३७० मुळे फुटीरतावाद तयार झाला

सुप्रीम कोर्टाने ३७० कलम हटवण्याबाबत मान्यता दिली. मात्र काँग्रेसने याबाबत अमान्य केले. हा विषय केवळ हिंदू- मुस्लिमांचा नाही. काश्मीरमध्ये जेवढे मुस्लिम नाहीत तेवढे उत्तर प्रदेश, गुजरात आणि असाममध्ये आहेत. मात्र फुटीरतावादी विचारसरणी नव्हती. ३७० कलमामुळे ती तयार झाल्याचं अमित शहा म्हणाले आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

8 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

8 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

9 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

12 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

13 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

13 hours ago