राजस्थानमधील राजीनामा नाटयानंतर आता अशोक गेहलोत (Ashok Gehlot) अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडले आहेत. त्यांना अनेक नेत्यांनी हा मोलाचा सल्ला दिला होता. शिवाय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर अनेक मोठया नेत्यांनी चर्चा देखील केली. काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोणीही निवडणूक लढवू शकतो. हे अजून स्पष्ट झाले नसले तरी, शशि थरुर, दिग्विजय सिंह आणि अशोक गेहलोत यांची नावे चर्चेत होती. आपल्याला अध्यक्षपद असे मिळावे यासाठी त्यांनी गंजगंज पछाडले. सोनिया गांधी ते राहूल गांधीपर्यंत हे पद मिळावे यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याचा फायदा सचिन पायलट यांनी उचलला आणि मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला.
कारण काँग्रेसच्या चिंतन शिबीरात ठरले होते. एका वेळी एकच पद मिळेल. त्यामुळे अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दयावा लागणार होता. ज्येष्ठ नेत्यांच्या सल्ल्याला मान देऊन अशोक गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडले आहेत. आता मुकुल वासनिक, के.सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे तसेच दिग्विजय सिंह यांनी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये उडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आणखी रंग चढला आहे.
हे सुद्धा वाचा
PM : पाकिस्तानात जन्मलेले भारताचे पंतप्रधान
Sonia Gandhi : सोनिया गांधींची डोकेदुखी वाढली
Shinde government : शिंदे सरकारने काढला गरीबांच्या तोंडातला घास
राजस्थान मधील काँग्रेस वर्किंग कमिटीने अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून वगळण्याची शिफारस सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. अशोक गेहलोत यांनी घालेल्या या गोंधळामुळे त्यांच्या पक्षातील लोकच त्यांच्यावर नाराज आहेत. आमदारांनी राजीनामे देऊन काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसला परवडणारे नाही. कारण आधीच काँग्रेस पक्षाला घरघर लागली आहे. पक्ष बळकट करण्यासाठी राहूल गांधींनी ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली आहे. त्यामुळे आता पक्षबांधणी करणे गरजे आहे.
आशा वेळी पक्षांतर्गत बंडाळी उफाळून आली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीने गेहलोत यांच्या विरोधात सोनिया गांधीकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास ठेवून यांना पक्षाची जबाबदारी देणे चांगले होणार नाही, त्यांच्या जागेवर दुसरी व्यक्ती घेणे गरजेचे आहे’.
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…