राजकीय

हेमंत करकरेंना लागलेली गोळी दहशतवाद्याच्या,उज्ज्वल निकमांनी…”; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचार  सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar)  यांनी २६/ ११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि माजी पोलीस अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार आणि जेष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “माजी आयपीएस अधिकारी हेमंत करकरे  यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या (shot by terrorist) (कसाब) बंदुकीतील नव्हती तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती.(Hemant Karkare shot by terrorist, Ujjwal Nikam…”; Vijay Wadettiwar’s serious allegations)

त्यावेळी हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम  यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले. त्यामुळे खरे देशद्रोही हे उज्ज्वल निकम आहेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. तसेच या विधानावर स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार यांनी “आपण हे वक्तव्य एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे,” असे म्हटले आहे. त्यामुळे आता या विधानावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, वडेट्टीवार यांनी मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देत पुढे म्हटले की, मी काहीही म्हटले नसून त्यावेळी विलासराव देशमुख म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कसाब दहशतवादी होता, त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. मी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत उज्वल निकम यांना काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी तो करावा”, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. यामुळे आता यावर उज्ज्वल निकम काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच या विधानावरून भाजपच्या नेत्यांनीही वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 

 

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

8 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

9 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

10 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

11 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

11 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

12 hours ago