राजकीय

शिंदे गट – भाजपचे अखेर ठरले! आगामी निवडणुकीत ‘या’ महापालिकेसाठी करणार युती

टीम लय भारी

औरंगाबाद : शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील संपुर्ण राजकारणाची समीकरणेच बदलली आणि सरकार म्हणून शिंदे – फडणवीस विराजमान झाले. या सत्तांतराच्या नाट्यानंतर शिंदे गट आणि भाजपला आता येत्या महापालिका निवडणुकीचे वेध लागले असून इथेसुद्धा विजय मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. दरम्यान येत्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट आणि भाजपने औरंगाबाद महापालिकेची निवडणुक एकत्र  लढविणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राजकीय वर्तुळातून समोर आली आहे, त्यामुळे राज्याला यानिमित्ताने पुन्हा एकदा एका नव्या युतीचे दर्शन घडणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिंदे गटात काल प्राथमिक बैठक पार पडली. याबाबतची माहिती शिंदे गटातील औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. यावेळी बोलताना जंजाळ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय झालाय. जागावाटपाबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. औरंगाबादमधील अनेक चांगले नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. हिंदुत्वासाठी एकत्र निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांना यावेळी व्यक्त केला.

दरम्यान,राज्यात शिंदे – फडणवीसांचे एकत्रित सरकर स्थापन झाले असून यापुढील निवडणुक एकत्रितपणे लढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर केल्यामुळे त्यांनी आधीच मास्टरस्ट्रोक मारला आहे, शिवाय औरंगाबादमधील सर्वच आमदार शिंदेगटात सामील झाले आहेत त्यामुळे शिंदे गट – भाजप यांच्या एकत्रित लढाईमुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा…

मोदी सरकारच्या काळात ईडीचे फावले? अर्थमंत्र्यांकडून ‘हे’ स्पष्टीकरण

सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे हाती बांधणार शिवबंधन

अजित पवारांची थेट शेतकऱ्यांसोबत बांधावर चर्चा

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

5 hours ago

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

6 hours ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

7 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

7 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

16 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

16 hours ago