महाराष्ट्र

‘गुड बाय..’चा मॅसेज करत महिलेची दोन मुलांसह आत्महत्या

टीम लय भारी

बुलढाणा : जिल्ह्यात असलेल्या करडी धरणात एका ३० वर्षीय महिलेने उडी घेऊन आत्महत्या (Woman commits suicide) केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन या धरणाच्या पाण्यात उडी घेतली (Woman commits suicide with two children while texting ‘Good bye..’). सरिता ज्ञानेश्वर पैठणे असे आत्म्हत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या कुटुंबासोबत धाडजवळ करडी या गावात राहण्यास होती. या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी करडी धरणाच्या परिसरात गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सरिता पैठणे या आपल्या पती आणि दोन मुलांसोबत औरंगाबाद येथे वास्तव्यास होते. पण दोन दिवसांपूर्वीच ते चौघेही आपल्या गावी करडी येथे परत आले होते. पण काल (दि. २७ जुलै २०२२) सरिता यांनी त्यांचा भाऊ शरद कौतिकराव दामोदर याला ‘गुड बाय.. आम्ही जग सोडून जातोय’ असा मॅसेज केला. त्यानंतर लगेच शरद यांनी बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. यानंतर त्यांनी सरिताचे पती ज्ञानेश्वर यांनी कॉल केला. यावेळी शरदने सरिताकडे फोन द्या, असे सांगितले. पण सरिता त्यांची मुलगी वेदिका (वय वर्षे ११) आणि मुलगा वंश (वय वर्षे ९) यांना घेऊन पहाटे पासून कोणालाही न सांगता निघून गेल्याचे सांगण्यात आले.

याबातबतची माहिती मृत महिला सरिता हिचा भाऊ शरदला मिळताच त्याने करडी गाव गाठले. यानंतर त्यांनी धाड पोलिसांत तक्रार दाखल करून मृत महिलेच्या पती, सासू-सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल केल्यानंतर सरिता यांचा मृतदेह करडी धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला. यानंतर सरिता यांच्या दोन्ही चिमुकल्यांचा शोध पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. मृत विवाहित महिला सरिता यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सरिताच्या पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात भादवी कलम ३०६, ४९८-अ, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :

सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे हाती बांधणार शिवबंधन

अजित पवारांची थेट शेतकऱ्यांसोबत बांधावर चर्चा

गावातील खराब रस्त्याने घेतला चिमूरड्याचा जीव

पूनम खडताळे

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

8 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

8 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

9 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

9 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

10 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

11 hours ago