राजकीय

जितेंद्र आव्हाड यांची नेमकी खंत काय?

टीम लय भारी
मुंबई: महाराष्ट्रातील भाजपने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर ओबीसी समाजाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावर जोरदार निशाणा साधला. समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी बोलताना श्री. आव्हाड यांनी ओबीसी समाजाला आपले हक्क मिळवून देण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल ताशेरे ओढले. “माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही.( Jitendra Awhad hat exactly is the grief )

ओबीसींना आरक्षण देणारा मंडल आयोग असूनही, समाजाचे नेते लढण्यासाठी मैदानात उतरले नाहीत कारण समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढायचे नाही असे दिसते. महार आणि इतर दलितांनीच लढा दिला,” श्री आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोदी – फडणविसांच्या विरोधातही आंदोलन करावे : प्रकाश शेंडगे

माझ्या घरावर मोर्चा येणार; मंत्री आव्हाडांनी ट्वीट करून दिली माहिती

जितेंद्र आव्हाड म्हणाले, वंचित समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी राजकीय आरक्षण दिले जाते. निर्यण प्रक्रियेतच त्यांना अधिकार नाही दिला तर तो पुन्हा वंचित राहतो. पूर्वीचा इतिहास तो कधीच पुसू शकत नाही. संपूर्ण युरोपमध्ये अफरमेटिव्ह अॅक्शनमध्ये रिझर्व्हेश आहे. तिथे एलजीबीटी, महिलांना, वर्णद्वेशींना रिझर्वेहशन आहे.

जगभरात रिझर्वेशन आहे. दुर्दैवाने याबद्दल आपण कधी बोललोच नाही म्हणून कळलंच नाही. ओबीसी हा गावकुसाबाहेबर गेलेला मोठा समूह आहे. गावागावात वेगवेगळ्या जाती समूहांचा संच आहे.११ लाख लोकप्रतिनिधींची ताकद रस्त्यावर उतरायला पाहिजे. पण तो एक येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“कालीचरण बाबाला ताबडतोब अटक करा आणि ठेचून काढा,” जितेंद्र आव्हाड संतापले

Maharashtra Minister Jitendra Awhad’s remarks on OBCs sparks row

“देशभारत #OBC राजकीय आरक्षण रद्द झाले. 11 लाख लोक प्रतिनिधीनी आपली पद गमावली राजकीय आरक्षण गेल्या मुळे #OBC मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला जाईल . हीच 11लाखांची ताकद रस्त्यावर उतरली असती, तर नवीन इतिहास लिहला गेला असता. अजून वेळ गेलेली नाही, एकत्र येऊया,” असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

Team Lay Bhari

Share
Published by
Team Lay Bhari

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

6 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

8 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

9 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

10 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

11 hours ago