राजकीय

अतूल भातखळकरांच्या ‘त्या’ ट्विटनंतर नाना पटोले भडकले!

मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त झाला. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर प्रचंड टीका झाली. सर्वोच्च न्यायालय देखील या घटनेने व्यतित झाले या घटनेची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यावर भाजपचे आमदार अतूल भातखळकर यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयावर टीका केली. त्यानंतर ‘सत्तेच्या मस्तीमुळे सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिम्मत होते’, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मैतेई आणि कुकी जमातींमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. जवळपास तीन महिन्यांपासून हा संघर्ष तेथे सुरु आहे. मात्र राज्य सरकार हा हिंसाचार आटोक्यात आणण्यात निष्फळ ठरले आहे. अमित शाह यांनी देखील मणिपूरचा दौरा केला मात्र त्यानंतर देखील हा संघर्ष अजूनही सुरु आहे. दरम्यान नुकताच मणिपूरमध्ये कुकी जमातीच्या दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास हा व्हिडीओ आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेत राज्य सरकारला कारवाईचा इशारा दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशानंतर भाजपचे आमदार अतूल भातखळकर यांनी एक व्टिट करत ”सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा… कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश सुरळीत चालेल.” असा निशाणा साधला.

हे सुद्धा वाचा 

शाळाबाह्य नऊ हजार मुलांना शाळेत आणले – शिक्षणमंत्री

डोंगराच्या कपारीत गाव वसलेले, सायकल देखील जावू शकत नाही; एकनाथ शिंदे यांनी सांगितला इर्शाळवाडीच्या काळरात्रीचा अनुभव!

मणिपूर महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी चर्चेस नकार दिल्याने काँग्रेसचा सभात्याग

त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार भातखळकर यांचा समाचार घेतला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर राज्यातील भाजपाच्या एका आमदाराने टीका करत कोर्टालाच सुनावणारे ट्वीट केले आहे. सुप्रीम कोर्ट व सरन्यायाधीशांवर बोलण्याची या भाजपा आमदाराची हिम्मत ही सत्तेचा माज असल्याने झाली आहे. या प्रकरणी राज्यपाल व सरन्यायाधीशांना अवगत करु असे नाना पटोले म्हणाले.

 

प्रदीप माळी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

10 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

3 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago