टीम लय भारी
मुंबई: आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा (Navneet Rana) हे दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नवनीत राणांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्रातील कुठलाही मतदारसंघ निवडा, मी तुमच्या विरोधात उभी राहणार आहे. तुम्ही जनतेतून निवडून येऊन दाखवा, असं आव्हान नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
हनुमान चालीसा पठण करणं आणि श्रीरामाचं नाव घेणं हा जर गुन्हा असेल तर १४ दिवस नाही तर १४ वर्ष तुरुगांत राहण्यास तयार असल्याचं नवनीत राणा (Navneet Rana) यांनी म्हटलं आहे. मी माझी लढाई पुढं सुरु ठेवणार आहे, असं राणा म्हणाल्या आहेत. माझ्यावरील कारवाई ज्या प्रकारे करण्यात आली ती जनतेनं पाहिली आहे. अजित दादा तुम्ही चांगलं काम करता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत. आमच्यावर लॉकअपपासून ते तुरुंगापर्यंत काय अन्याय झाला? याची माहिती घ्या. तुम्ही रोखठोक बोलणारे आहात. तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
हे सुद्धा वाचा:
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व फडणवीस सरकारच !: नाना पटोले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…
हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा ('400 par' slogans) देत…