राजकीय

भाजप आमदार नितेश राणे यांचे खळबळ उडवून देणारं ट्विट

टीम लय भारी

मुंबई : राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडी सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून देणारे सुचक ट्विट केले आहे ( Nitesh Rane tweeted about saffron government ).

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली दिल्लीवारी ( Uddhav Thackeray meets Narendra Modi ), त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून झालेले संभाषण यांमुळे राज्यात बदलाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र येतील असे कयास बांधले जात आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये तणाव वाढत चालला आहे. आगामी येणाऱ्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणूका स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे ( Clashes between Congress and Shivsena ).

हे सुद्धा वाचा

सदाभाऊ खोत यांनी ‘महाविकास आघाडी’ला दिली भन्नाट उपमा, तुम्हालाही हसू येईल !

काँग्रेसला धनगरांबद्दल आसूया; कार्यकर्त्याला पद दिले, अन् एकाच दिवसांत काढून घेतले

उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंना ठणकावले

प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र समोर आले आहे ( Pratap Sarnaik’s letterbomb ). नरेंद्र मोदी आणि भाजपाशी जुळवून घेण्याची विनंती सरनाईक यांनी केली आहे.

या पत्रानंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून देणारं ट्विट केले आहे ( Nitesh Rane made big statement ). या  ट्विटमध्ये भाजपा आमदार नितेश राणे ( Nitesh rane ) यांनी ‘महाराष्ट्रात भगव्याचं राज्य येते आहे. हीच ती वेळ’ असे म्हणत एकप्रकारे राज्यात आगामी काळात राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत.

आमचा ‘यू ट्यूब’ चॅनेलही सबस्क्राईब करा

तुषार खरात

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

16 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

16 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

17 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

18 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

18 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

18 hours ago