23 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंना ठणकावले

उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंना ठणकावले

टीम लय भारी

मुंबई :- शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला आहे. मात्र, शिवसेनेच्या (Shiv Sena) ५५व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यावर सडेतोड भूमिका मांडत काँग्रेसला (Congress) प्रत्युत्तर दिले आहे.

“जे अनेक राजकीय पक्ष कोरोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना मला सांगायचंय की स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतेच नसते. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागते. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल, तर वार कसा करणार?” असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.

राहुल गांधी… २०२४ सालातील देशाचे पंतप्रधान

उद्धव ठाकरे शिवसैनिकांना देणार कानमंत्र, वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष

Uddhav Thackeray reviews infra works, says expedite work on Mumbai-Nagpur expressway

तीन सण महत्त्वाचे

प्रमोद नवलकर म्हणायचे शिवसैनिकांसाठी तीन सण आहेत, 23 जानेवारी शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, दुसरा म्हणजे 19 जून शिवसेनेचा (Shiv Sena) वर्धापन दिन आणि 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. हे तिन्ही दिवस आपण उत्सवासारखे साजरे करतो आणि केलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.

जर शिवसेना प्रमुखांनी पक्ष स्थापन केला नसता तर…

“अनेक राजकीय पक्ष कोरोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ स्वबळाचा नारा. स्वबळ तर हवे. ताकद तर कमवावीच लागते. पण ती कशी? माझे आजोबा आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे की स्वत:चे बळ आणि आत्मविश्वास असायला हवा. जर आत्मविश्वास नसेल तर तू काहीही करू शकणार नाही आणि आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर तुला कुठेही मरण नाही. आत्मबळ आणि स्वबळ हेच तर शिवसेनेने (Shiv Sena) दिले. शिवसेनेची (Shiv Sena) स्थापना झाली, तेव्हा मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती. मराठी माणसाला अपमानित बनून जगावे लागत होते. तेव्हा शिवसेना (Shiv Sena) प्रमुखांनी शिवसेनेची (Shiv Sena) स्थापना केली नसती तर आज महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाची जी अवहेलना झाली असती ती विचारता सोय नाही”, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

बळच नाही तर वार कसले करताय?

काँग्रेसला (Congress) यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्ष शब्दांमध्ये देखील सुनावले. “स्वबळाविषयी मी का सांगतोय तर जे अनेक जण सध्या स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना सांगायचंय मला की स्वबळ म्हणजे फक्त निवडणूक लढण्यापुरतेच असायला हवे असे नाही. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागते. नाहीतर अन्याय होतोय आणि अन्यायाविरुद्ध वार करायचाय पण बळच नाहीये आणि वार कसले करताय? आधी तलवार उचलण्याची ताकद कमवावी आणि मग वार करावा. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात निवडणुका जातात. हारजीत होत असते. जिंकले तर आनंद आहे. पण हारल्यानंतरसुद्धा पराभूत मानसिकता घात करते”, असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काही दिवसांपासून स्वबळाचा नारा द्यायला सुरुवात केली आहे. “आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचे आमचे धोरण जाहीर केले आहे. समजा आम्ही सोबत आहोत असे म्हटले आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असे सांगितले, तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही विधानसभा स्वतंत्रच लढणार”, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत. तसेच, “आम्ही आजपासूनच जाहीर करतोय. आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत. त्यामुळे आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. मित्रपक्षांना देखील आमचा संदेश आहे की तुम्हीही तयारी सुरू करा”, असे देखील नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेसला (Congress) अप्रत्यक्षपणे सुनावल्यानंतर त्यावर काँग्रेसची (Congress) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

मुंबई काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील आज मुंबईत बोलताना स्वबळाची मागणी केली. आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची परवानगी द्या, मग बघा, असा इशाराच त्यांनी दिला आहे. “काल-परवापर्यंत काँग्रेसचा (Congress) कॉग्निझन्स लोक घेत नव्हते. आज फक्त काँग्रेस (Congress) काय करतेय हे बघत आहेत. मग ते मुंबई असो वा महाराष्ट्र असो. माझी तुमच्याकडे विनंती आहे. राहुल गांधींना विनंती आहे. सोनिया गांधींना विनंती आहे. आम्हाला एकटे (स्वबळावर) लढू द्या. तेव्हा बघुयात किस मे है कितना दम”, असे भाई जगताप म्हणाले आहेत.

आघाडी किती दिवस टिकणार…

देशाभिमान पहिला, आमचे हिंदुत्व संकुचित नाही. शिवसेनेने (Shiv Sena) महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडले का असे विचारले जाते. हिंदुत्व हे नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, श्वास आहे. त्यामुळे गैरसमज करु नका, युती तोडली, आघाडी केली, किती टिकणार वगैरे, त्याची काळजी करु नका. आमचा हेतू प्रामाणिक आहे. राज्याचा विकास करणे, गोरगरिबांची आशीर्वाद मिळवणे. त्यासाठी काही करत असू तर हे सोडले आणि ते धरले असा त्याचा अर्थ होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

गाव कोरोनामुक्त करा

राजकारण बाजूला ठेवा, आपल्या वर्धापन दिनी कार्यक्रम देतोय, गाव कोरोनामुक्त करा. हा कार्यक्रम आम्ही देतोय. असा कोणता पक्ष आहे का वर्धापन दिनी राजकारण बाजूला ठेवा असे सांगतोय. गाव कोरोना मुक्त करण्याचा, घर कोरोनामुक्त करण्याचा नारा देणारा कोणता पक्ष आहे का? असा सवालही त्यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी