राजकीय

राणें पुत्रांच्या अडचणी काही कमी होईना,तिथे नवाब मालिकांचा राजीनामा स्वीकारला जाईना

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रावादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य संदर्भात निलेश राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये १२ मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष महाराष्ट्र यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, निलेश राणे आणि नितेश राणे यांनी जाणीवपूर्वक समाजामध्ये द्वेषाच्या भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने भाष्य करुन समाजात दंगल घडविण्याचा कट रचत असल्याबाबत आणि शरद पवार साहेबांचे नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडून त्यांच्या जिवाला धोका निर्माण केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात यावी.

तक्रारीत त्यांनी म्हटलं, शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाग असणाऱ्या महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार आहे. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने दाऊद इब्राहिम संबंधित गुन्ह्याच्या तपासात अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास चालू असून नवाब मलिकांविरोधात अद्यापही काहीही ठोस पुरावा मिळाला नाहीये.

काय आहे राणे बंधूंची प्रतिक्रिया ?

आम्ही हिंदूची बाजू घेतली आहे, तसेच चुकीचं काही बोलेलो नाही. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, सकाळी आमच्या विरोधात तक्रार झाल्याचे समजले आहे. योग्यवेळ आल्यावर त्यावर बोलेन असं नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. तसेच महाविकास आघाडीसरकारला दाऊदचा इतका पुळका आहे तर त्यांनी दाऊदला महाराष्ट्र भूषण देऊन टाका अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. त्याचबरोबर आम्ही काहीही चुकीचं बोललेलो नाही अनिल देशमुख . हिंदु असल्याने त्यांचा राजीनामा घेतला मग नवाब मलिक मुस्लिम असल्याने त्याचा राजीनामा घेतला नाही का ? असा सवाल आम्ही उपस्थित केला. आम्ही हिंदू मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, तसेच दोन्ही समाजात तेढ निर्माण व्हावं अशी आमची इच्छा देखील नाही.योग्य वेळी आम्ही योग्य उत्तर देऊ असं नितेश राणेंनी सांगितलं.

Jyoti Khot

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

9 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

10 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

11 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

13 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

13 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

14 hours ago