महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा उग्र झाला आहे. महाराष्ट्र सरकारने सीमप्रश्नी बैठक घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई स्वतः कोर्टात गेले व त्यांनी कर्नाटक सरकारकडून प्रख्यात वकील रोहतगी यांची नियुक्ती केली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हरीश साळवे यांची वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. ज्यावेळी आघाडीचे सरकार होते. त्यावेळीही ह्या खटला सुरू होत्या. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हरिश साळवे यांची नियुक्ती केली होती. हरिश साळवे यांना या सर्व प्रकरणाची माहिती आहे. सुप्रीम कोर्टात पहिल्या पाच वकिलांमध्ये हरीश साळवे यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे तत्क्षणी मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने हरिश साळवे यांची नियुक्त करावी, अशी आग्रही मागणी अजित पवारांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …
नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in…
काश्मीर प्रश्नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…
‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…
आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…
पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…