राजकीय

उदयनराजे भोसले इतके हतबल झालेले मी गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा पाहतोय : अनिल गोटे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारात जाऊन दाताच्या कण्या केल्या तरी दिल्लीश्वर राज्यपालांची हकालपट्टी करत नाहीत, हेच खरे सत्य आहे. हाच पुरावा आहे. अन्यथा राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर राज्यपाल बदलणे एवढी कठिण गोष्ट नाही. उदयनराजे भोसले इतके हतबल झालेले मी गेल्या ५० वर्षात पहिल्यांदा पाहतोय! त्यामुळे माझी सर्वच नेत्यांना विनंती आहे की, महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यांना तरी छत्रपती आपले वाटतात का ? हा खरा प्रश्न निर्माण होतो, असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केला.
अनिल गोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्राची स्थापना झाल्या पासून आजतागायत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा इतका कधीही आणि कुणीही अपमान करण्याचे धाडस केले नाही. ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तेव्हा पासून शिवाजी महाराजांबददल गुजराथ्यांच्या मनामध्ये एक अढी आहे. शिवाजी महाराजांबद्दल वेळेवाकडे बोलले की, तर त्यांचा अंहकार सुखावतो. ही वस्तुस्थिती आहे म्हणुनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शाह आणि शहेनशाह यांच्या दिल्ली दरबारात जाऊन किती ही दाताच्या कण्या केल्या तरी दिल्लीश्वर राज्यपालाची हाकलपट्टी करीत नाहीत. हेच खरे सत्य आहे. हाच याचा पुरावा आहे. अन्यथा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अथवा उपमुख्यमत्र्यांनी सांगिल्यानंतर एक राज्यपात बदलणे एवढी कठीण गोष्ट नाही.
हे सुद्धा वाचा

‘संजय राऊत यांचे तोंड म्हणजे कपडे सुकविण्याचे बॉयलर’
उदयनराजे भाजप नेत्यांना म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का ?
मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी!
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपनेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना अनिल गोटे यांनी म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत, त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राचे आदर्श व युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी वेळोवेळी ठरवून अपमान केला आहे. आता तर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि मंत्री मगंलप्रसाद लोढा यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची तुलना औरंगजेब बादशाह बरोबर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवरायांबरोबर केली. परंतु विषयाचे गांभिर्य लक्षात घेउन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: खुलासा केला की, शिवाजी महाराजांची तुलना कुणाबरोबर होऊ शकत नाही.

टीम लय भारी

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

7 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

7 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

10 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

11 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

12 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

12 hours ago