औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी शरद साखर कारखान्यात प्रचंड गैरव्यवहार केला आहे. तसेच शहरात त्यांची नऊ दारूची दुकाने आहेत. असा आरोप विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. संदीपान भूमरे यांनी मनी लॉंड्रिंगच्या माध्यमातून केलेल्या या व्यवहाराचे पूरावे माझ्याकडे असून ते मी लवकरच समोर आणणार असल्याचा इशारा देखील अंबादास दानवे यांनी दिला. मनी लाँड्रिंग सारखा प्रकार या कारखान्यात सुरु असून स्वतःच्या विकासासाठी हे सगळं चालू आहे. असं देखील दानवे म्हणाले. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सध्या राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू असून पैठण येथे झालेल्या सभेत अंबादास दानवे यांनी फलसंवर्धन, आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्यावर हल्लाबोल केला.त्यावर संदीपान भुमरे, अंबादास दानवे यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी मग त्यांच्या आरोपांना उत्तर देऊ.असं व्यक्तव्य केलं आहे.
याबाबत अंबादास दानवे यांनी ट्विट देखील केले आहे. ट्विट मध्ये त्यांनी हे नमूद केले आहे की, “शरद साखर कारखान्यात गद्दार मंत्री संदीपान भूमरे यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला आहे. मनी लॉंड्रिगच्या माध्यमातून केलेल्या या व्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. लवकरच याचे पुरावे मी समोर आणणार आहे”.
नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…
गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना माेक्का (MCOCA) लावण्यात आला…
भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…
याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…
पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…