काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई मेट्रो ३ च्या प्रकल्पाची यशस्वी चाचणीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. मुंबई मेट्रो ३ चा प्रकल्प हा कुलाबा-वांद्रे-सीप्ज या मार्गिकेवरून धावणार आहे. आमच्या लयभारीच्या टीमने या बदद्ल लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात आम्हाला हे जाणवले की लोक एकंदरीत या प्रकल्पाच्या बाबतीत उत्सुक आहेत. हा प्रकल्प सुरू झाला की लोकल ट्रेनची गर्दी कमी होईल. संध्याकाळी सामान्य जनतेला पश्चिम उपनगराच्या दिशेने जाताना लोकांना दगदग करावी लागणार नाही. सर्वसामान्य लोकांनी सरकार व शासकीय यंत्रणेला एवढेच आवाहन केले की हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. मुंबईच्या चाकरमान्यांची एवढीच मागणी आहे की या प्रकल्पाचे दर सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडतील असे असावेत. कारण आता मुंबई मेट्रो चे दर साधारणत ५० रूपये आहेत व येत्या दोन-तीन वर्षामध्ये ते दर अजून वाढण्याची शक्यता आहे. त्याच्या फेऱ्या नियमित असाव्यात याची काळजी घेतली तर जनतेचा प्रवासाचा वेळ वाचेल व त्यांचा प्रवास सुखकर होईल.
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…