महाराष्ट्र

RSS : आरएसएसने बॉम्बस्फोटांचे दिले प्रशिक्षण, स्वयंसेवकाच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक असलेल्या यशवंत शिंदे यांनी सोशल मीडियावर केलेल्या विधानाने एकच खळबळ उडवून दिली आहे. कदाचित त्यांच्या या विधानाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपची झोप उडणार आहे. या संघटनांनी भारतामध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची सुपारी दिली होती. याचा गौप्यस्फोट केला आहे. यशवंत शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत होते. 2006 रोजी नांदेडला झालेल्या बॉम्बस्फोटा संदर्भातील आरोपींचे नाव सांगून धमाका उडवून दिला. यशवंत शिंदे हे 1995 साली जम्मू काश्मीरमध्ये प्रचारक होते. त्यांनी संघाच्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनीच या बाबत हे खळबळ जनक वक्तव्य केले आहे.

29 ऑगस्टला विशेष न्यायालयात त्यांनी आपल्याला या प्रकरणाचे साक्षीदार करावे असे प्रतिज्ञा पत्र सादर केले आहे. न्यायालयाने त्यांचा अर्ज स्विकारला आहे. त्यावर न्यायालय 22 सप्टेंबरला मत मांडणार आहे. नांदेडला झालेल्या बॉम्बस्फोटामधील मुळ आरोपी बाहेर आहेत. आणि पकडलेले आरोपी वेगळे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. बॉम्ब स्फोटाचे कट रचणारे मुळ आरोपी हे मोकाट फिरत आहेत. तपास यंत्रणांनीच या आरोपीला हात लावला नाही असे संजय शिंदे यांचे मत आहे. मुळ आरोपी हा मिलींद परांडे हा आहे.

हा 2006 मध्ये अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेचा संघटक आहे. पूर्वी तो विश्व हिंदू परषिदेचा महराष्ट्र राज्याचा संघटक होता. त्यालाच भाजपने सुपारी देऊन बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. संजय शिंदे यांनी हे विधान व्ट‍िटरवर केले आहे. त्यामुळे अनेकांनी त्यावर कमेंट देखील केल्या आहेत. 70 वर्षांपासून संघाला आतंकवादी घोषित करण्यासाठी षडयंत्र सुरू आहेत अशा प्रकारच्या कमेंट भाजप समर्थकांनी केल्या आहेत. 2003-2004 दरम्यान भाजपकडून त्याने बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याची सुपारी घेतली होती. त्यानंतर 2004 ला देशात अनेक ठिकाणी बॉम्ब स्फोट झाले होते.

हे सुद्धा वाचा

आमदार संतोष बांगर यांची पुन्हा सटकली, सरकारी संघटना भडकली, वादाचा चेंडू आता मुख्यमंत्र्याच्या कोर्टात

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरेंच्या भेटीने सर्वांच्या भूवया उंचावल्या

NCP : ‘पन्नास खोके महागाई एकदम ओके’ घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात धुळयात आंदोलन

5 एप्रिल 2006 ला नांदेडच्या पटबंधर नगरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. हा स्फोट एका घरामध्ये झाला होता. बॉम्ब बनवतांना हिंमाशु पांसे आणि कोंडावर मारले गेले होते. अनेक जण यावेळी जखमी देखील झाले होते. हा स्फोट होण्यामागचे कारण म्हणजे तरुण बॉम्ब बनवत होते. ही केस नांदेडच्या न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच 2003 मध्ये पुणे येथील सिंहगड येथे झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या वेळी देखील तरुण बॉम्ब‍ बनविण्याचे प्रशिक्षण घेत होते. संजय सिंह यांनी मिलिंद परांडे यांच्यासह अनेकांचा सहभाग होता. 2004 च्या निवडणुकीसाठी बॉम्बस्फोटाचा कट रचण्यात आला होता.

रूपाली केळस्कर

Recent Posts

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

8 mins ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

36 mins ago

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

1 hour ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

2 hours ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

2 hours ago

त्र्यंबकमध्ये उटीची वारी सोहळा उत्साहात

चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला (Ooty's wari) विशेष महत्व आहे. मंदिर परिसर…

3 hours ago