टीम लय भारी
भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावा निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत- चीन सीमेवर चीननं सुमारे ६२४ गावं वसवल्याचं समोर येतंय. ही माहिती खुद चीन सरकारच्या सरकारी वेबसाईट ‘तिबेट डॉट सीएन‘ने सोशल मीडियावर प्रसारीत केली आहे. या अशा घटनांमुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी सीमेवर चिनी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले होते.अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, चीनकडून अरुणाचल प्रदेशाच्या भारतीय सीमेनजिक काही गावं उभारलेली आहे.
या गावांचा फायदा चीनला होणार आहे. ही गावं ज्या ठिकाणी वसवण्यात आली आहे तो अतिशय दुर्गम भाग आहे. चीनने या ६२४ गावांत वीज, पानी, पक्के रस्ते, मेडिकल सुविधा आणि रुग्णालये तसंच इंटरनेट ब्रॉडबॅन्डची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलीय. या प्रकरणावर सध्या भारताकडून कोणतीही प्रतिक्रया आलेली नाही.
लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…
महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…
राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…
घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…
गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…
जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…