33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रPolitics : मुलानं ट्विट करायचं आणि बापानं खुलासा द्यायचा, मला तेवढाच उद्योग...

Politics : मुलानं ट्विट करायचं आणि बापानं खुलासा द्यायचा, मला तेवढाच उद्योग आहे का?

पार्थ पवारांच्या ‘त्या’ ट्विटवर अजितदादांनी सोडले मौन

 

टीम लय भारी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पार्थ पवार यांच्या (Politics) मराठा आरक्षणावरील ट्विटबद्दल छेडले असता अजित पवार यांनी, ‘मला तेवढाच उद्योग नाहीय’, असा संताप व्यक्त केला.

आता अलिकडची मुलं काय काय ट्विट करतात. प्रत्येकवेळी तुम्ही विचारता, तुमच्या मुलाने हे ट्विट केले, तुमच्या मुलानं ते ट्विट केले. मुलानं ट्विट करायचं आणि बापानं खुलासा द्यायचा. तेवढाच मला उद्योग नाहीय. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्विट करायचं हा ज्याला त्याला अधिकार असतो. पण मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल, ज्याला त्याला आपला न्याय्य हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची ती भूमिका नाही.

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीबाबत जे घडले ते वाईट होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरीही अशा घटना घडता नयेत. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे, जेणेकरुन असा प्रकार करणारी विकृती दहा वेळा विचार करेल, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी चुकीच्या पध्दतीने वागत असल्याबाबत भाष्य केले. महात्मा गांधी यांचे विचार आजच्या शतकातही प्रगतीचा मार्ग दाखविणारे आहेत, असे अजित पवार म्हणाले. हाथरसमध्ये माणुसकीला काळीमा फासण्यात आला. जो प्रकार घडला त्याला शब्द नाहीत. अशा घटना महिलांच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या बाबतीत घडत आहेत. काही काळ चर्चा होते आणि जो तो आपापल्या कामाला लागतो. निर्भया घडले, त्यानंतरही अनेक घटना घडल्या. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे, असे मत अजित पवार यांनी मांडले.

राहुल गांधी यांच्या तिथे जाण्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता असे नाही. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना पीडीतेच्या कुटुंबाला भेटू दिले पाहिजे. कारण संसद असेल किंवा विधानसभा, तो विषय मांडण्यासाठी वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असते, असेही अजित पवारांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी