एज्युकेशन

बारावी परीक्षेत पावने दोन लाख विद्यार्थ्यांना 35 ते 45 टक्के गुण; सव्वा लाख विद्यार्थी डिस्टींगशन मध्ये

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या १२ वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातून एकुन 14,16,371 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी 12 वी परीक्षेत पास झाले आहेत. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकण टक्केवारी 91.25 टक्के एवढी आहे. उत्तीर्ण झालेल्या एकुण विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३१ हजार ५६१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर १ लाख ७६ हजार ७६३ विद्यार्थ्यांना ३५ टक्के ते ४५ टक्के गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 2.97 टक्के घट झाली आहे.

गेल्यावर्षी सन 2022 साली बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला होता. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. मात्र यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्यात आला नव्हता. तसेच परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात आली होती, त्यामुळे निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल; मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल

आईचं कलेक्टर होण्याच स्वप्न अधुरे राहिले: मुलाने युपीएससीत मिळवले दमदार यश

भारतीय आयटी कंपन्यांचे कॅम्पस हायरिंग 40 टक्क्यांनी घटणार!

बारावीच्या निकालात यंदा कोकण विभाग अव्वल आहे कोकण विभागाचा निकाल 96.25 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल पुणे विभाग दुसऱ्या स्थानी असून पुणे विभागाचा निकाल 93.34 टक्के इतका आहे. तर तिसऱ्या स्थानावर कोल्हापूर विभाग असून 93.28 टक्के इतका निकाल कोल्हापूर विभागाचा लागला आहे. अमरावती विभागाचा निकाल 92.25 टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 91.85 टक्के लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 91.66 टक्के लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 90.37 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून 88.13 टक्के इतका मुंबई विभागाचा निकाल लागला आहे.

12 वीचा गेल्या पाच वर्षांचा निकाल 

2018 – 88.41 टक्के
2019 – 85.88 टक्के
2020 – 90.66 टक्के
2021 – 99.63 टक्के
2022 – 94.22 टक्के

प्रदीप माळी

Recent Posts

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

6 mins ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

2 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

2 hours ago

अखेर हेमंत गोडसे यांना नाशिकमधून महायुतीची उमेदवारी

शिवसेनेकडून हेमंत गोडसे (Hemant Godse candidature ) यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा…

2 hours ago

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा; नरेन्द्र मोदी

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक…

3 hours ago

विरोधकांच्या चुकीच्या मुद्द्यांना प्रभावीपणे उत्तर द्यावे:डॉ.भारती पवार

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची गगनाला गवसणारी प्रगती झाली असून आज जगभरात भारताचे मान उंचावली आहे…

3 hours ago