बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. कार्तिक आर्यनच्या भूलभुलैय्या 2 (Bhool Bhilaiyaa 2 Movie)चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कार्तिकचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच ‘भूलभुलैय्या 2’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरची आणि कार्तिक आर्यनच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. (Bhool Bhilaiyaa 2 Movie)
२००७ साली ‘भूलभुलैय्या’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलुन घेतला होता. हा सिनेमा सुपरहीट झाला होता. आता कार्तिकचा हा सिनेमा काय कमालं करतोय ते काही दिवसांनी कळेलचं, या सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. चित्रपटात (Bhool Bhilaiyaa 2 Movie) कार्तिकसोबत अभिनेत्री किआरा अडवाणी, राजपाल यादव, तब्बू आणि संजय मिश्रा इत्यादी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
या सिनेमाच्या टीझरची सुरूवातच या गाण्याने होतेयं. सुरूवातीला एक भयानक हवेली आणि एक दरवाजा दिसतोयं, ज्यामध्ये मंजुलिका नृत्य करतानाची झलक दिसतेयं. मात्र, तिचा पूर्ण चेहरा दिसून येत नाही. त्यानंतर, टीझरमध्ये कार्तिक आर्यनचा लूकही समोर आला आहे, टीझरसोबतच हा चित्रपट 20 मे 2022 रोजी रिलीज होणार (Bhool Bhilaiyaa 2 Movie) असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘Bhool Bhulaiyaa 2’ teaser excites Kartik Aaryan fans, actor trends on social media
एकीकडे संविधानाच्या मूळ तत्वांना चिरडायचे आणि दुसरीकडे खोटा कळवळा दाखवायचा : रोहित पवार
जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत…
प्रचंड जिद्दीची,चिकाटीची, अतुलनीय शौर्याची आणि प्रखर देशाभिमानाची।। होय,आज अभिमानाने सांगावेशे वाटत आहे. कहाणी रानवड च्या…
संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झालीय.…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाविकासआघाडी सरकारवर खळबळजनक…
महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नुकतीच पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील परिसरात अनाधिकृत बॅनर्स व…
कांदा (Onion) निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी…