नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे नवरात्रोत्सवाला बंदी होती. आता नवरात्रीला काही दिवस बाकी आहे. त्यामुळे सर्वांना गरब्याचे (Garba Song)वेध लागले आहेत. गरबा नाचण्यासाठी कोणत्या गाण्यांची निवड करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र आता तशी काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण फाल्गुनी पाठकने नवरात्रीसाठी खास गाणं गायले आहे. यापूर्वी देखील तिची गाणी लोकांच्या पसंतीला उतरली होती. फाल्गुनी पाठक यांचे ‘वसालड़ी’ हे नवे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यावर नऊ दिवस दांडीया तसेच गरबा प्रेमी थिरकणार आहेत. हे गाणं धम्माल उडवून देणार आहे. विनोद भानुशाली यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याच्या टीममध्ये शैल हांडा देखील आहे.
या गाण्याची शब्द रचना भोजक अशोक अंजाम यांनी केली आहे. याची कोरिआग्राफी जिगर सोनी आणि सुहराद सोनी यांनी केली आहे. एल्बमचे निर्देशन संजय लोंधे यांनी केले आहे. फाल्गुनी फाटकच्या गाण्याशिवाय गरबा अधूरा राहिल असे सगळयांनाच वाटते. या गाण्यावर प्रतिक्रिया देतांना फाल्गुनी पाठक म्हणते की, मी आपल्या चाहत्यांच्या प्रेमासाठी मी म्युजिक तयार करते. या नवरात्रीसाठी मी वसालडी हे गाणं श्रोत्यांना भेट दिले आहे. माला आशा आहे की, हे गाणं नवरात्रीमध्ये आनंद वाढवणार आहे….. तिच्या चाहत्यांना हे नवे गाणे नक्कीच आवडणार आहे. यापूर्वी देखील तिची गाणी सुपरहिट ठरली होती.
हे सुद्धा वाचा
T-20 : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे तीन दिग्गज खेळाडू संघाबाहेर
Aryan Khan : आर्यन खाने स्वत:ला सावरले, सोशल मीडियावर झाला सक्रीय
फाल्गुनी पाठक यांची लोकप्रिय गाणी :-
मैंने पायल है छनकाई, चूडी, मेरी चुनर उड उड जाए, ओ पिया, पल-पल तेरी याद. ही त्यांची लोकप्रिया गाणी आहेत.
फाल्गुनी पाठक यांचा जन्म मुंबईमध्ये 12 मार्च 1964 मध्ये झाला. फाल्गुनी पाठक या गुजराती गायीका असून, त्यांची गुजराती गाणी खूप प्रसिद्ध आहेत. कोकीलाबेन देखील त्यांच्या गाण्याच्या फॅन आहेत. फाल्गुनी यांना 4 बहीणी आहेत. आई वडीलांना तिने गाणे गावे असे वाटत नव्हते. परंतु आता गाण्यासाठी त्यांना हजारो रुपये मिळतात. फाल्गुनी या सामान्य कुटुंबातील आहे. सहज म्हणून त्यांनी गाण्याकडे डोकावून पाहिले.
खूप कमी वेळातच त्यांची यशाला गवसणी घातली. फाल्गुनी यांना 4 बहिणी आहेत. त्यांच्या जन्माच्यावेळी आईवडीलांना मुलाची अपेक्षा होती. ती पुर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे फाल्गुनी नेहमी मुलांसारखा पेहराव करतात. सुरूवातीला फाल्गुनी जेव्हा स्टेज परफॉमन्स करायच्या त्यावेळी त्यांना आईवडीलांचा ओरडा खावा लागला. त्यांना मार देखील खावा लागला होता.
लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…
आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…
सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…
निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…