प्रसिद्ध हिंदी चित्रपट लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला चरक यांचा तो मोठा मुलगा आहे. सलमानबद्दल असे म्हटले जाते की, तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचे नशीब इंडस्ट्रीत चमकते. त्याला अरबाज, सोहेल, अलविरा आणि अर्पिता अशी पाच भावंडे आहेत.
खुद्द सलमान खान म्हणाला, विषारी साप मला तीन वेळा चावला
राधा आमच्यासाठी पूज्यनीय, सनीचा डान्स अश्लील; मथुरेतील संतांचा ‘मधुबन’ गाण्याला विरोध
सलमानची दुसरी आई हेलन त्यांच्या काळातील लोकप्रिय कॅबरे डान्सर होत्या. शालेय शिक्षण संपल्यानंतर सलमान खानने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण मध्यातच कॉलेज सोडले. एकीकडे सलमान खान जिथे लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर दुसरीकडे त्याच्या आयुष्यात असे अनेक वाद आहेत, जे अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहतात. ‘बिइंग ह्युमन’ या संस्थेच्या माध्यमातून सलमान गरजू लोकांना मदत करत असतो.
एक सुपरहिट चित्रपट नंतर रिकामा!
सूरज बडजात्याच्या ‘मैंने प्यार किया’ या रोमान्स चित्रपटाने बॉलिवूडमध्ये सलमान खानचे नशीब चमकले. हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. मात्र, या चित्रपटानंतर सलमान खानला सहा महिने रिकामे बसावे लागले होते.
ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट
नेमकं कारण काय?
‘मैंने प्यार किया’ या चित्रपटासाठी सलमानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. चित्रपटसृष्टीत सलमान खानला सर्व काही सहज मिळाले असे नाही, त्याने खूप संघर्षही केला आहे. सलमान खानने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. जेव्हा मी लोकांकडे भूमिका विचारायला जायचो, तेव्हा कोणी म्हणायचे की मी हिरोसाठी लहान आहे, तर कोणी म्हणायचे की मी त्या वयापेक्षा मोठा आहे. याच कारणामुळे अनेक महिने घरी बसावं लागलं. मात्र, सलग सुपरहिट चित्रपटांनंतर आता सलमान बॉलिवूड इंडस्ट्रीचा स्टार बनला आहे.
‘या’ व्यक्तीकडून घ्यायचा सल्ला!
सलमान खानने स्वतः फिल्मफेअर दरम्यान एक किस्सा शेअर केला आणि सांगितले की, जेव्हा त्याचे चित्रपट चालत नाहीत, तेव्हा तो सल्ला घेण्यासाठी एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे जात असे. एक किस्सा सांगताना सलमान खान म्हणाला की, जेव्हा तो अयशस्वी ठरला, तेव्हा सनी देओल त्याला सपोर्ट करायचा. तसेच करिअरच्या वाढीसाठी त्याने सनी देओल आणि संजय दत्तची मदत घेतल्याचे देखील सांगितले. सलमान खान म्हणाला की, 90 च्या दशकाच्या सुरुवातीला, जेव्हा तो त्याच्या करिअरमध्ये संघर्ष करत होता, तेव्हा संजय दत्त आणि सनी देओल इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव बनले होते.
लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…
महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…
राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…
घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…
गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…
जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…