टीव्ही इंडस्ट्रीतून एकामागून एक वाईट बातम्या येत आहेत. यापूर्वी ‘भाभी जी घर पर है’ मधील मलखान उर्फ दिपेश भान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येच्या वृत्ताने तिचे चांगलेच चाहते हादरले आहेत. वैशालीने मोठ्या कालावधीपासून टेलिव्हिजनच्या विश्वात राज्य केले होते. आपल्या अभिनयातून तिने अनेक चाहत्यांच्या मनावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे तिच्या आत्महत्येने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
वैशालीने केली आत्महत्या
वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षापासून टीव्हीपासून दूर होती आणि तिच्या मूळ गावी इंदूरमध्ये राहत होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. लव्ह लाईफमुळे अभिनेत्रीने गळफास घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सध्या तेजाजी नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा
Raj Thackeray : ‘भाजपने अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये’; राज ठाकरेंची पत्र लिहून फडणवीसांना विनंती
Eknath shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील ‘मोस्ट हेट नेम!’; सामनातून मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ
Anil Deshmukh Hearing : ‘वसूलीचे आदेश अनिल देशमुखांनीच दिल्याचे वाझेंनी मान्य केलंय’ सीबीआयचा दावा
दरम्यान, वैशाली ठक्करने 5 दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या मजेशीर व्हिडिओमध्ये ती ‘दिल जिगर नजर क्या है, मैं तो तेरे लिए जान भी दे दूं’ गाताना दिसली. सगळे खूप हसले. इन्स्टाग्रामवर वैशालीचा हा मजेदार व्हिडिओ पाहून तिच्या ओळखीचे आणि चाहते खूप हसले. पण वैशाली मनातल्या मनात वेदना घेऊन सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करत होती हे कुणालाच माहीत नव्हतं. या व्हिडीओमध्ये वैशालीही मरण्याची क्रिया करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत वैशालीने आयुष्य संपवण्याचा निर्णय फार पूर्वीच घेतल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्याचवेळी, प्रेमात तिला फसवण्यात आल्याचेही बोलले जात आहे आणि त्यामुळेच तिने हा व्हिडिओ फनी स्टाइलमध्ये अपलोड केला आहे.
वैशाली गेल्या वर्षभरापासून इंदूरमध्ये राहत होती आणि आज तिचा मृतदेह तिच्या घरातून सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली असून, त्याचा तपास सुरू आहे. तिच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. मात्र, तरीही एखाद्या व्यक्तिसाठी जीव गमावणे आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांच्या ह्रदयालर घाव करणे योदग्य नसल्याच्या भावना यावेली व्यक्त केल्या जात आहे. परंतू अद्याप या प्रकरणात कोमताही खास खुलासा पोलिसांमार्फत करण्यात आलेला नाही. त्यामुळे याप्रकरणातील सत्य तपासाअंती कळेल.
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…