Featured

मोबाईल चोरीला गेलाय? ‘हे’ काम वेळीच करा अन्यथा तुमचा डेटासुद्धा…

सध्याच्या काळात स्मार्टफोन प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची बाब झाला आहे. सध्या मोबाईलच्या वाढत्या मागणीप्रमाणेच मोबाइल चोरीचेही प्रमाण वाढले आहे. मोबाइल चोरी झाल्यामुळे आपले आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय आपला खाजगी डेटा आणि फोनमध्ये असलेली खूप महत्वाची अशी माहिती सुद्धा त्यासोबत चोरी जाण्याची भीती असते. आता फोन केवळ कॉल करण्यासाठी नाही, तर त्यात अनेक सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स त्याचे डिटेल्स सेव्ह असतात. त्यामुळे फोन चोरी झाल्यास, असा महत्त्वाचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी फोन लगेच ब्लॉक करणं अतिशय महत्त्वाचं आहे.

त्यासाठी राज्य सरकारने देखील पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने CEIR या पोर्टलची निर्मिती केली आहे.
तुमचा मोबाईल चोरी झाल्यास अथवा हरवल्यास तुम्हाला काही गोष्टी वेळीच कराव्या लागतील. त्याचप्रमाणे या कार्यात लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सायबर पोलिसांच्या वातीने करण्यात आले आहे.

1) प्रथम पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी लागेल.
2) तुमचं सिम कार्ड ब्लॉक करावं लागेल आणि त्याच नंबरच सिम कार्ड घेऊन ते चालू करावं लागेल. CEIRला तोच नंबर द्यावा लागेल.
3) http:www.ceir.gov.in/Home/Index.jsp
या वेबसाईटवर संपर्क साधावा.
4) Blok Stolen/Lost Mobile यावर क्लीक करून आवश्यक ती माहिती भरावी आणि submit वर क्लिक करावे.
5) वेबसाईटवर खालील कागदपत्रे जोडवीत सॉफ्ट कॉपीची साईझ 500kb पेक्षा कमी असावी.
* पोलीस स्टेशनला केलेल्या तक्रारीची प्रत
* मोबाईल खरेदी केल्याचं बिल
* कोणतंही सरकारी ओळखपत्र जोडावे
6) यावर आपल्याला तक्रार नोंदवल्याचा रिक्वेस्ट नंबर मिळेल
7) हरवलेला मोबाईल activ/on झाल्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाईलद्वारे तुम्हाला smsद्वारे लगेच मिळेल. आणि ती माहिती नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवायची आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल लगेच तुम्हाला परत मिळेल.

हे सुद्धा वाचा: 

सावधान; मोबाईल खिशात असताना फेसबुक ऐकते तुमचे बोलणे!

मोदी सरकारचा चीनवर डिजिटल स्ट्राईक, ४३ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी

भारतीयांना परवडणारे तंत्रज्ञान विकसित करुन मारुती-सुझुकीचा ई- वाहनांची निर्मिती करण्याकडे कल

Stolen Mobile, lost phone, Stolen Mobile will be recovered from CEIR, CEIR Govt Application for lost phone

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

19 mins ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

2 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

2 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

4 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

5 hours ago