टीम लय भारी
इंदौर : मध्यप्रदेशच्या धार जिल्हयात आज सकाळी इंदौरहून पुण्याकडे येणारी बस नर्मदा नदीमध्ये कोसळली. यामध्ये सुमारे 55 प्रवासी होते. यामध्ये 13 लहान मुलांचा समावेश होता. बस बाहेर काढण्यात यश आले आहे. 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. अमळनेर खलघाट ठिगरी येथे हा अपघात झाला. पावणे दहा वाजता ही घटना घडली. संजय सेतू पूलवर ही घटना घडली. हा अपघात इंदौरपासून 80 किमी अंतरावर झाला.
तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. 7 कुटुंब या बसमध्ये होती. यामध्ये 13 लहान मुलं होती. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 15 प्रवाशांना बाहेर काढल्याचे म्हटले आहे. खलघाटामध्ये ही बस इतर वाहनांचा ओव्हरटेक करत असतांना वाहकाचे बस वरील नियंत्रण तुटल्याने हा अपघात घडला. जोरदार मदत कार्य सुरु आहे. ही बस महाराष्ट्र राज्य परिवहनची आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चैहान यांनी शासकीय मदतीची घोषणा केली आहे. प्रशासनाबरोबर स्थानिकांनी देखील मदत कार्य सुरु केले आहे.
हे सुध्दा वाचा:
मुंबईला आज पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’, विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा ‘इन अॅक्शन’ मोडमध्ये
विकास कामांची ऐसीतैसी, मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांचा घेणार बदला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…
हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…
नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…
एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…
उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…