टीम लय भारी
मुंबईः अनेक वर्षांपासून दिवसा शेतीला पाणी मिळावे अशी बळीराजाची मागणी होती. ती आता पुर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज बैठक झाल्याचे माध्यमांना सांगितले. 2018 साली घोषीत केलेली मुख्यमंत्री सौर कृषी योजना पुन्हा एकदा ‘फास्ट टॅक’वर आणार असल्याचे या बैठकीत निश्चित झाले आहे. ही योजना 1 वर्षांत राज्याच्या विविध भागात सुरु होईल. ही बातमी बळीराजासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंद देणारी आहे. 2018 मध्ये 200 मेगावॅटचे काम सुरु केले होते. हे काम थांबले होते.
काही गावांमध्ये वीज बिल न भरल्यामुळे लाईट बंद आहेत. रस्त्यावरचे दिवे बंद आहेत. वीज बिल न भरल्यामुळे कृषी पंपाचे कनेक्शन कापण्यात आले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी या योजनेला पुन्हा नव्याने उभारी देण्याचे काम नवीन सरकार करणार आहे. जूनी थकबाकी महावितरण आणि राज्य सरकारने भरावी. त्यानंतर गावांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडून दयावे असा निर्णय आजच्या बैठकीत झाला.
ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. दिवसा वीज नसते. रात्री सिंगल फेज वीज मिळते. त्यामुळे शेतीला पाणी देण्यास अडचण निर्माण होते. शेतकरी रात्रीच्या वेळी शेतशिवारात जावून पिकांना पाणी देतो. हे सर्व करतांना खूप त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी विंचू, साप, कोल्हे, लांडगे यांची भीती असते. अनेक वेळा बिबटे, तरस माणसांवर हल्ला करतात. त्यामुळे अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.
विशेषतः उसाच्या मळयात रात्रीच्या वेळी पाणी दिले जाते. अनेक पिकांना रात्रीच्या वेळी पाणी दयावे लागते. काही वर्षांपासून शेतशिवार हे हिंस्त्र प्राण्यांचे वस्तीस्थान बनले आहे. त्यामुळे दिवसा वीज मिळाली, तर बळीराजा नक्कीच सुखावणार आहे.
हे सुध्दा वाचा:
राज्यात दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता
VIDEO : बीएमसीच्या कोट्यावधी रुपयांच्या कामाची पावसाने दिली पोचपावती
जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…
तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…
डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…
उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…
गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…
कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…