33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रCAA मुस्लिमांच्याच नव्हे देशातील ३० टक्के हिंदुंच्या विरोधात : संजय राऊत

CAA मुस्लिमांच्याच नव्हे देशातील ३० टक्के हिंदुंच्या विरोधात : संजय राऊत

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA ) केवळ मुस्लिमांच्या विरोधात नसून देशातील ३० टक्के हिंदुंच्या विरोधात आहे. असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. पूर, त्सुनामीसारख्या घटनांमुळे गावेच्या गावे वाहून जातात, घरं-दारं, सामान वाहून जातं, कोणत्याच प्रकारचा पुरावा शिल्लक राहत नाही. त्यात मुस्लिमच नव्हे तर हिंदू, ख्रिश्चन सर्व धर्माची लोकं असतात. ते पुरावा आणणार कुठून? असं राऊत म्हणाले.

विरोधात (CAA) कितीही विरोध झाला तरी केंद्र सरकार एक इंचही मागे हटणार नाही या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा आज शिवसेनेने समाचार घेतला. ‘गृहमंत्र्यांनी एक इंचही मागे हटू नये. विरोधकच त्यांना मागे ढकलतील’, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शनिवारी केली. मुंबई मराठी पत्रकार संघात CAA, CAB आणि NRC कायद्या संदर्भात आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.जी कोळसे पाटील, वरिष्ठ वकील मिहीर देसाई, युसूफ मुच्छाला उपस्थित होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘CAA कायदा पारित झाल्यानंतर देशात एक प्रकारची भीती दिसून येतेय. ही भीती घालवण्याची आज आवश्यकता आहे. या देशात भीती दाखवणारे येतात आणि जातातही. अशाच भीतीच्या वातावरणात आम्ही महाराष्ट्रात धैर्याने सत्ता स्थापन करून दाखवली. जामिया मिल्लिया इस्लामीया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध करत ‘तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा जालियनवाला बाग घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणारे उद्धव ठाकरे हे देशातले पहिले नेते होते. विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या जात असतील तर समजा देशातलं स्वातंत्र्य धोक्यात आहे, असंही राऊत म्हणाले.

CAA मुस्लिमांच्याच नव्हे देशातील ३० टक्के हिंदुंच्या विरोधात : संजय राऊत

विद्यार्थ्यांचे काम केवळ अभ्यास करणे असून आंदोलनं करणे नव्हे असं पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा म्हणाले होते. परंतु स्वातंत्र चळवळीपासून आजपर्यंतची सगळी मोठी आंदोलनं विद्यार्थ्यांनी केली होती, याची आठवण राऊत यांनी करून दिली. भगत सिंहांपासून अशफाकुल्ला खानपर्यंत जे हुतात्मा झाले त्यांचे वय काय होते? १९७५ साली नवनिर्माणचं आंदोलन झालं त्यात कुणी सहभाग घेतला होता? त्यावेळी अरुण जेटलींचं वय काय होतं? असा सवाल राऊत यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी