टीम लय भारी
मुंबईः राज्यात पावसाचे धुमशान सुरु आहे. राज्यातील 6 जिल्हयात 4 दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, गडचिरोली जिल्हयांचा समावेश आहे.मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर आणखी वाढला असून, अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर शहापूर तालुक्यात 4 जण वाहून गेले. पालघरच्या सोमटा गावात पहाटे घर कोसळले. वसईला विरारला रात्रंदिवस पावसाने झोडपून काढले आहे. वसईमधील राजूरीमध्ये दरड कोसळली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. भिवंडी शहरात पाणी घुसले असून, वीजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
पुणे जिल्हयात देखील संततधार सुरुच आहे. भूगाव रोडवर पाणी साचले होते. पुण्याचे खडकवाला धरण 100 टक्के भरले आहे. लोणावळयाच्या भुशी धरणाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हिंगोली जिल्हयात मधूमती नदीला पूर आला आहे. तर नाशिकमधील दारणा, गंगापूर धराणातून विसर्ग सुरु असून, गोदावरी नदीने रौद्र रुप धारण केले आहे. नाशिक मधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे सुध्दा वाचा:
बंडखोरी करुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतले बाळासाहेबांचे दर्शन
‘सुशांत सिंह’ मृत्यू प्रकरणी ‘रिया’ला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा
लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…
महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…
राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…
घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…
गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…
जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…