टीम लय भारी
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे हे षडयंत्र आहे. हे ऑपरेशन लोटस आहे. भारतीय जनता पक्षाने आमदारांचे अपहरण केले. त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार केल्याचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. अपहरण झालेल्या आमदारांच्या जीवाला धोका असल्याचे संजय राउत यांनी यावेळी सांगितले. या आमदारांवर खूनी हल्ले केले. ते दहशतीमध्ये आहेत. तसेच काही आमदारांना बाहेर पडायचे आहे असा निरोप आल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार आणखी अडीच वर्षे चालेल. आम्हाला पोट निवडणूका नको असे अनेक आमदारांचे मत आहे. देशभरातील प्रमुख नेत्यांनी या विषयावर शिवसेना नेत्यांशी संवाद साधला. सात स्तरांची पोलीस सुरक्षा एकनाथ शिंदे ठेवलेल्या हाॅटेलला आल्याने प्रवेश मिळणे अवघड झाले. गुजरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने या नाराजी नात्याची चर्चा देशभर रंगली.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला एक प्रस्तावाला दिला. मात्र प्रस्तावाला पक्षात स्थान नाही. असे संजय राऊत यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व आम्हाला बालपणीच मिळाले. राजस्थान आणि मध्यप्रदेशप्रमाणे ऑपरेशन लोटस येथे होऊ देणार नाही.
हे सुद्धा वाचा :
एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद हवे होते
भाजपचे नेते ‘बांधणी‘ करत होते; तेव्हा महाविकास आघाडीचे नेते ‘झोपा‘ काढत होते !
EXCLUSIVE : शिवसेनेचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात
शरद पवार म्हणाले, सरकार वाचवविण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…
एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…
गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…