दुसरं लग्न करण्यासाठी 30 वर्षीय वडिलांनी स्वतःच्या मुलाची हत्या केली आहे. हा प्रकार धारावी येथील शाहू नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला आहे. या प्रकरणात वडील रेहमत अली आणि त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे.
भयानक अशी ही घटना आहे. शाहू नगर हा झोपडपट्टीचा विभाग आहे.याठिकाणी रेहमत अली आपली पत्नी ताहिरा बानू आणि दोन वर्षांचा मुलगा असद अस कुटूंब राहत होत. बुधवारी रेहमत आणि ताहिरा हे शाहू नगर पोलीस स्टेशन ला गेले आणि आपला दोन वर्षांचा मुलगा असद हा हरवला असल्याची तक्रार केली. त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला.यावेळी रेहमत यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींनी खरी माहिती पोलिसांना दिली.यानंतर पोलिसांनी रेहमत याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली असता सर्व उघडकीस आलं.
रेहमत याने आधी असद याचा गळा दाबून मारलं.त्यानंतर त्याचा मृत्यदेह पांढऱ्या पिशवीत भरला.ती पिशवी हयात हॉटेलच्या समोर आलेल्या मिठी नदीत टाकली.माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी इतरांच्या मदतीने असद यांच्या मृत्यदेह शोधून काढला.यावेळी मृतदेहाचे उंदिरानी लचके तोडले होते.डोक्याचा आणि पोटाचा भाग खाल्ला होता.मृत्यदेह पोस्ट मार्टेम करण्यासाठी पाठवण्यात आला.
यानंतर सुरू झाली रेहमत याची चौकशी.सुरुवाती ला तो काही सांगत नव्हता.मात्र,पोलिसांनी त्यांच्या स्टाईल चौकशी सुरू केल्यावर त्याने तोंड उघडलं.रेहमत याची बायको तर होतीच पण त्या व्यतिरिक त्याच एका महिले सोबत प्रेम प्रकरण होत.रेहमत ला दुसऱ्या बाईशी लग्न करायचं होतं.पण लग्नात पत्नी आणि मुलाची अडचन होती.त्याच्या मैत्रीन तुझ्या बायको, मुलाचं काही तर कर अस सतत सांगत होती.यामुळे मग रेहमत याने प्रथम मुलाला संपवलं. या गुन्ह्यात त्याच्या मैत्रणीने ही साथ दिली होती.यामुळे तिला ही अटक करण्यात आली आहे. खर तर रेहमत याचा खरा प्लान बायकोची हत्या करण्याचा होती. पण त्याने आधी मुलाला संपवलं.
हे सुद्धा वाचा
नारायण राणे विरोधात संजय राऊत यांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल
एलॉन मस्कचा धंदा म्हणजे धंदा; पैसे न भरल्याने अमित शाह,अमिताभ, सलमान, विराट ब्ल्यू टिकविना
कोण संजय राऊत? अजित पवार यांचा संतप्त सवाल
या प्रकरणात रेहमत आणि त्याच्या मैत्रिणीस अटक करण्यात आली आहे.दोघेही सद्या पोलीस कोठडीत आहेत.
गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…
राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…
कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…