टीम लय भारी
मुंबईः राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी येत्या चार दिवसात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवडयात राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. उद्यापासून राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील चार दिवस मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवारी आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुमारे 15 दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 16 बंधाऱ्यांवर पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हे सुध्दा वाचा:
VIDEO : प्लास्टिकचा वापर आरोग्यास घातक
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…
हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली…