महाराष्ट्र

Maharashtra News : सामान्य माणसाला समोर ठेवून पत्रकारांनी काम करावे – डॉ. नीलम गोऱ्हे

पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे सभागृहात मराठी पत्रकार परिषदेचे 43 व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, मिलिंद अष्टीकर, विनोद जगदाळे, अरुण कांबळे, सुनील लोणकर बाबासाहेब ढसाळ आदी उपस्थित होते. 16 नोव्हेंबरला राज्यभरात राष्ट्रीय पत्रकारिता दिवस साजरा करण्यात आला. याच निमित्ताने मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी पत्रकारिता याबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सामान्य माणसाला समोर ठेऊन आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पत्रकारांनी काम करावे, असे मनोगत यानिमित्ताने व्यक्त केले.

विधान परिषदेच्या उपभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणाऱ्या बातम्या वाचायला चांगल्या वाटतात. पत्रकारिता आणि न्यायव्यवस्था हा नागरिकांचा खरा आधार आहे. अशा प्रकारच्या पत्रकारितेची समाजाला गरज आहे. केवळ टीआरपी केंद्रीत बातम्यांभोवतीच आजची पत्रकारिता फिरू नये आणि सभोवतीच्या गढूळ वातारणातही चांगले घडविण्यासाठी व्यावसायिकरित्या चांगले काम करणाऱ्या आणि निर्भयपणे काम करणाऱ्या पत्रकारांना प्रतिसाद मिळावा.

आज समाजातील असहिष्णुता वाढली आहे. पूर्वी भाषेतला रांगडेपणा होता. मात्र अलिकडे टीका करण्यातला वैचारिक स्तर खालावला आहे. याचा समाजातल्या पत्रकारांना जसा त्रास होतो, तसे ज्यांना काही विचार व्यक्त करायचे आहे त्यांनाही त्रास होतो. वर्तमानपत्र आज उत्पादन अनेकांचे उत्पादनाचे स्रोत झाले आहे. त्यामुळे त्याचा खप वाढवणे, इतरांना जोडून घेणे, इतरांपेक्षा अधिक चांगले उत्पादन करणे महत्वाचे झाले आहे.

हे सुद्धा वाचा

Chhatrapati Shivaji Maharaj : ‘महाराजांनी औरंगजेबाला माफीसाठी 5 पत्रे लिहिली होती’, भाजप प्रवक्त्याची जीभ घसरली

Shraddha Walker murder : श्रद्धाने आफताबविरोधात 2020साली केली होती पोलिस तक्रार!

Koshyari’s Controversial Statement : “अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही !”

कोविडनंतर वृत्तपत्रांना मोठा फटका बसला. काहींची नोकरी गेली, काहींचे कोरोनामुळे निधन झाले. उपसभापती असूनही फार करता आले नाही याचा खेद वाटतो, असेही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी मत व्यक्त केले. कोविडमध्ये जे पत्रकार दगावले त्यांची जबाबदारी उद्योग म्हणून चालविल्या जाणाऱ्या माध्यम समूहांनी स्विकारावी. दुसऱ्या बाजूला काही वृत्तपत्रांमध्ये बातम्यांपेक्षा जाहिराती मिळविणे हे प्रमुख काम पत्रकाराला करावे लागते. पत्रकारिता व्यावसायिक असू नये असे आपण म्हणतो, पण तो व्यवसाय जरी झाला असला तरी व्यवसायाचे नियम पाळून पत्रकारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळणे गरजेचे आहे, ते मनोगत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

पूनम खडताळे

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

6 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

7 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

7 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

7 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

8 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

9 hours ago