राज्यपाल हा निष्पक्ष असायला हवा, राज्यातील पेचप्रसंगांची त्यांनी सोडवणूक करायला हवी. पण आपले राज्यपाल मात्र काहीही बोलतात. पण आता राज्यपाल जे काही बोलतात ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. केंद्राने हे सँपल परत घेऊन जावे अन्यथा महाराष्ट्र इंगा दाखवेल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात मिंधे सरकार आल्यापासून कुणीही यावे आणि टपलीमारून जावे अशी अवस्था असून महाराष्ट्राची अवहेलना सातत्त्याने सुरू असल्याचे सांगत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छ. शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत खरपूस समाचार घेतला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात मराठी लोकांचा अपमान केला, त्या आधी सावित्रीबाई फुले यांचा देखील त्यांनी अपमान केला होता. आता त्यांनी शिवरायांबद्द्ल वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपालांना हटवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचा इशाराही दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या पक्षाची केंद्रात सत्ता असते त्यांच्या विचारसरणीचा माणूस राज्यपाल म्हणून राज्यांमध्ये नेमला जातो. मात्र राज्यपालांची नेमणूक करताना त्या व्यक्तीची कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही, ज्या व्यक्तीला वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल का नेमले जाते असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
हे सुद्धा वाचा :
विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा.. प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Anil Gote : देवेंद्र फडणविसांना पाहून सरड्यानेही रंग बदलणे दिले सोडून’
राज्यपाल कोश्यारींनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर भाजप घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे, हा त्यांच्या पक्षाचा राजकीय अजेंडा आहे की काय असा प्रश्न पडत असल्याचे देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपालांना हटवले नाही तर अशा महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे असे आवाहन करत, शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंद करु आणि महाराष्ट्र लेचापेच्यांचा नाही हे केंद्राला दाखवून देऊ असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना…
उन्हाळा सुरु झालाय तर उन्हाळ्यात आपल्याला काही न काही थंड पियायच असतं तर त्या साठी…
केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…
जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…