राजमान्य , राजश्री , श्रीमान राजजी ठाकरे साहेब
जय भारत !!!
साहेब कसे आहात तुम्ही ? ५२ मिनिटाच्या भाषणाने थकला असाल ना ? आता तीन-चार महिने आराम करा. पावसाळा गेला की बघू आपण महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत . साहेब , तुम्ही चालू केलेली हनुमान चालीसा अजून एक आठवडा वाजेल बरं का . त्यानंतर नाटककार फडणवीस आणि मंडळी नवीन पेन ड्राइव बाहेर काढतील आणि तुमच्या चालीसा बंद होतील . या महाराष्ट्रात फडणवीसांना आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त फुटेज मिळाल्याचे चालत नाही . एबीपी देवेंद्र आणि इतर गोदी मिडियाला तसा निरोप कधीच गेला असेल .(MNS Raj thackeray’s political stand become changed)
राज साहेब , सुरुवातीला तुमची काय क्रेझ होती . मराठी माणसाचा मुद्दा , ती खळखट्टयाकची भाषा . मराठी माणसांना नुसती गुदगुल्या करत होती . तुमचा तो विविधरंगी भगवा पांढरा हिरवा निळा रंगाचा कल्पक झेंडा . तुम्ही एकदम सर्वसमावेशक वाटत होतात . नेता असावा तर तुमच्यासारखाच . तुम्हाला जसा जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घातलेला शेतकरी आवडत होता तसाच आम्हाला सर्वसमावेशक तुमच्यासारखा नेता आवडला होता .
नंतर तुमच्या राजकीय सल्लागारांनी तुमची उलटी गिनती चालू केली . तुमच्या पक्षाचे चिन्ह रेल्वे इंजिन याचे तोंड बदलले . इंजिनाचे तोंड उजवीकडे की डावीकडे असे बालिश खेळ चालू केले . आपले चिरंजीव आजारी पडले तेव्हा आपण आपल्या दहा बोटातल्या आंगठ्या , गळ्यातील माळा फेकून दिल्या . चिरंजीव चांगला झाल्यावर त्याच माळा , अंगठया जागेवर आल्या .
विचारांची बैठक पक्की नसल्यावर माणूस असा सैरभैर वागतो साहेब . असो .
नंतर तुम्ही झेंड्याचा रंगच बदलला . मराठी सोडून हिंदुत्व स्वीकारलं . तुम्हाला वाटलं उद्धवजी ठाकरे यांच्या वडिलांनी जसे राजकारण केले तसेच मी सुद्धा करेल . पण साहेब , त्यांना त्यांच्या पक्षाच्या वाढीला तेव्हाच्या काँग्रेसने मनापासून मदत केली . काँग्रेस आणि भाजपमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. भाजपा आणि विशेष म्हणजे देवेंद्र भाई तुमचा वापर भाजीतील कडीपत्यासारखा करून कधी फेकून देतील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही . असो .
तुम्ही राजकारणातील सल्लागारांची कोणती ” शिदोरी ” घेऊन चालला आहात हे तुम्हालाच माहित .
साहेब , तुमच्या हनुमान चालीसावर सोशल मीडियावर भरपूर खिल्ली उडवली जात आहे बर का . लोक आता लाव रे ती हनुमान चालीसा असे म्हणू लागले आहेत . साहेब चालीसा हा भैयाचा हिंदी भाषिक शब्द आहे . तुम्ही शिवतीर्थवाले , किमान स्तोत्र हा शब्द वापरायला काय हरकत होती . हिंदुत्व करता करता मराठी भाषेच्या शब्दांची सुद्धा तुम्ही करून टाकली की काय ?
साहेब त्या दिवशी एक तरुण कार्यकर्ता म्हणत होता की , साहेबांना भ्रष्टाचाराबद्दल किती राग आहे बघा . साहेबांनी कधी भ्रष्टाचार केलाच नाही का हो ? मी ठामपणे म्हटले , नाही !!! मग तो म्हणाला , साहेबांनी नुकतीच शिवतीर्थ नावाची भली मोठी बिल्डिंग बांधली मग त्याच्यासाठी कुठून पैसे आणले असतील ? मागे कोहिनूर मिल विकत घेतली तेव्हा कुठून पैसे आणले असतील ? इतक्या महागड्या गाड्या कशा वापरतात ? मुलाचे लग्न इतक्या धुमधडाक्यात कसे साजरे करतात ? एक सर्वसामान्य व्यंगचित्रकार इतकी संपत्ती कशी जमा करू शकतो ? पेट्रोल-डिझेल , कांदे-बटाटे , तूरडाळ , गहू , तांदूळ , मटन , चिकन ,फोनचा रिचार्ज , टी व्ही रिचार्ज ,डॉक्टरचा खर्च , मेडिसिनचा खर्च , उंची कपडे , महागडे गॉगल , यासाठी कुठून पैसा आणत असतील ? मी म्हणालो , गप्प बस . ईडी सारखे प्रश्न विचारु नकोस . येडा बिडा झाला की काय ? असले फालतू प्रश्न आपण कार्यकर्त्यांनी कधीच विचारायचे नसतात . तरी तो पुढे कसा विचारतो माहिती आहे का ? तो म्हणाला , सध्या एक लिंबू दहा रुपयाला झालाय हे साहेबांना माहीत आहे का हो ?
साहेब , आपल्या भाषणात तुम्ही त्या भैय्यांच्या उत्तरप्रदेशचा उदो उदो केलात . डायरेक्ट 360 अंशात फिरलात . मानलं बुवा आपल्याला . लोकांच्या विस्मरणशक्तीवर काय जबरदस्त कॉन्फिडन्स आहे आपल्याला ?
आपण कनिष्ठ ब्राह्मण . म्हणजे सी.के. पी . हो ! एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाला बरोबर वाचवतो . आपल्याकडे एकच आमदार ( तोही स्वतःच्या कर्तुत्वाने निवडून आलेला ), 2 ते 3 नगरसेवक असताना बामणी आणि गोदी मीडियाच्या जीवावर आपण आणि आपला पक्ष अजून जिवंत आहे . नव्हे जाणीवपूर्वक जिवंत ठेवला जात आहे . नाहीतर पक्षाचा आख्खा एक खासदार असताना त्या ओवेसीभाईची लाईव्ह सभा या ब्राह्मणी मीडियाने कधी दाखवली नाही ती .
साहेब , तुम्ही तुमच्या स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमा ठेवता . त्या प्रतिमांसमोर फिल्मी स्टाईलने मुजरा घालता . आणि त्या जागेवरूनच जाती-जातीत द्वेष पसरवणारे भाषण कसे काय देऊ शकता ? साहेब , तुम्ही प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा चालविण्याऐवजी त्या ब. मो .पुरंदरेचा वैचारिक वारसा चालवित आहात . त्यामुळेच तुमचा वैचारिक पाया ठिसूळ असल्याने तुम्ही पटकन 360 अंशात गर्रकन गोल गोल फिरता .
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन आपण केलेत . साहेब मनसेच्या स्थापनेच्या कित्येक वर्षे अगोदरपासून प्रत्येक वर्षी बाबासाहेबांची जयंती दणक्यात धुमधडाक्यात साजरी होते . गेल्या काही वर्षांपासून देश विदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी होते . साहेब , या आवाहनाबरोबरच दलित विद्यार्थ्यांची सरकारने स्कॉलरशिप बंद केली आहे , जातीयवादी प्रेमप्रकरणातून अनेक दलित तरुण मुलांच्या हत्या झाल्या , त्याबद्दल आपले मत कधी ऐकले नाही . या मुलांच्या रोजगारबद्दलची कोणतीही ब्लू प्रिंट , ग्रीन प्रिंट , रेड प्रिंट आपण कधी सादरच केली नाही . आपण चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झाल्याचे एकही चित्र उपलब्ध नाही . मग कशाला उगाचच पुतना मावशीचे प्रेम दाखवता ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बऱ्याच दलाच्या प्रमुखपदी मुसलमान होते . बाबासाहेबांचे संविधान हे प्रथमही भारतीय आणि अंतिमतः ही भारतीय हेच शिकविते .
आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांना तुम्ही तुमच्या भाषणात अरे-तुरेची भाषा वापरली . किती जळाव एखाद्यावर . किती द्वेष करावा एखाद्याचा . तुम्ही अरेतुरीचे भाषा वापरल्याने त्यांच्या पदाची गरिमा थोडीच कमी होणार आहे . उलट त्यामुळे तुमची संस्कृती दिसून आली .
साहेब तुमचा वैचारिक गोंधळ इतका जबरदस्त झाला आहे की तुमची भाषाच गोंधळलेली झाली आहे . आणि तुम्ही निवडलेला राजमार्ग आता एखाद्या गल्लीतल्या मार्गासारखा दिसत आहे .
शरद पवारांवर टीका करताना काही वाटत नाही का हो तुम्हाला साहेब ? प्रसिद्धी मिळविण्यासाठी पुण्यात पवार साहेबांची तुम्ही प्रकट मुलाखत घेता . त्यांच्या घरी बिन बुलाये मेहमान भेटायला जाता . त्यांच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित राहता . तेव्हा त्यांचा पक्ष हा जातीयवादी आहे हे तुमच्या लक्षात येत नाही का ? तेव्हा कुठे गेला राधेसुता तुझा धर्म ? साहेब , हा डबल गेम बंद करा . वैयक्तिक संबंध वगैरे गोड गोड शब्दच्छल बंद करून टाका आता .
जय संविधान !
जय भारत !!
जय महाराष्ट्र !!!
लेखक : ऍड .विश्वास कश्यप ,
माजी पोलिस अधिकारी
राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, घाटकोपर येथे मनसे कार्यकर्त्यांकडून स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आली
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…