टीम लय भारी
नाशिक : नाशिक येथील त्र्यंबक तालुक्यातील शेंद्री पाडा येथे पुल नसल्यामुळे महिलांची समस्या लक्षात घेत आदित्य ठाकरे यांच्या सहकार्यातून लोखंडी पूल बांधण्यात आला होता, परंतु पुराच्या पाण्यामुळे चक्क पुलच वाहून गेल्यामुळे पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून महिलांना पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन कसरत करावी लागत आहे. याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे.
लाकडी बल्ल्यांवरून डोक्यावर हंडा घेऊन जाणाऱ्या महिलांचे धक्कादायक वास्तव काही महिन्यांपूर्वी माध्यमांनी पुढे आणले होते, त्यावर प्रतिसाद देताना आदित्य ठाकरे यांनी मदतीचा हात पुढे करीत शेंद्री पाडा येथे लाकडी बल्ले काढून त्या ठिकाणी लोखंडी पूल बांधला. काही दिवसांनी आदित्य ठाकरे हे स्वतः या पुलाच्या उद्घाटनासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेले होते.
दरम्यान, मागील दहा दिवसांत नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पावसाच्या धुवाधार कोसळण्याने पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला. पुल वाहून गेल्यामुळे पाण्यासाठीची महिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू झाली असून याबाबतचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेची घडी पुर्णपणे विस्कटली. शिवसेनेला पुन्हा उभं करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने ठाकरे पुन्हा नाशिकला भेट देणार का, वाहून गेलेल्या सदर पुलाबाबत काही पावलं उचलणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा…
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आज निकाल, कोणत्या उमेदवाराला मिळणार पद?ट
MPSC मार्फत शिक्षक भरती घेण्याचा शिक्षण आयुक्तालयाने शासनाला दिला प्रस्ताव
बाळासाहेबांच्या नावाची निलेश राणेंना चिंता? उद्धव ठाकरेंना सुनावले खडे बोल
जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…
तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…
डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…
उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…
गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…
कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…