टीम लय भारी
रत्नागिरी : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण गेल्या २४ तासात पडलेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी आपात्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी राज्यात एनडीआरएफ पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. यामुळे पुढील आठ दिवस हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांपासून परशुराम घाटात पावसाची संतत धार सुरु आहे. त्याचबरोबर या घाटातील महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने हा घाट २० तासांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पण हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर दरड कोसळल्याने पुन्हा हा घाट बंद करण्यात आला आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक कळंबस्ते-लोटे मार्गाने वळविण्यात आली आहे.
या घटनेनंतर येथील नागरिकांनी प्रशासनाला या घाटातील दरड कोसळणाऱ्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले आहे. पावसाळ्यात या घाटात कायमच मोठे दगड कोसळत असतात. त्यामुळे दरवर्षीच हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. दरम्यान, या घटनेनंतर या धोकादायक बनलेल्या घाटाची पाहणी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून करण्यात आली.
हे सुद्धा वाचा :
राज्यात पुन्हा ‘मुसळधार’चा हाहाकार?
जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…
अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…
गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…
गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…
नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…